आशाताई बच्छाव
बागलाणची जागा काँग्रेसला सोडा,अन्यथा पराभवास सामोरे जा..!! आदिवासी काँग्रेस सेलचा महाविकास आघाडीस इशारा..(नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे) नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व चांदवड-देवळा मतदारसंघाचे माजी आमदार मा.शिरीषभाऊ कोतवाल साहेब यांच्या चांदवड येथील तालुका काँग्रेसच्या कार्यालयात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.मिलिंद भाऊ चित्ते,जिल्हा परिषद सदस्य सौ.रेखा पवार यांचे पती व ताहाराबाद ग्रामपंचायत सदस्य यशवंत पवार,बागलाण तालुका आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण भील,उपाध्यक्ष विलास निकम,कोटबेलचे ग्रामपंचायत सदस्य दिपक माळी,टेंबे ग्रामपंचायत सदस्य वैभव मोरे यांच्यासह आदिवासी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन बागलाण मतदारसंघ हा आदिवासीबहुल मतदारसंघ असुन वर्षानुवर्ष येथे काँग्रेसचा पारंपारिक मतदार आदिवासी समाज हा राजकीय निराधार झाला आहे.कारण गेल्यावेळेस हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडल्यामुळे येथे त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.बागलाण हा सुरवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बागलाण तालुक्यातून आदिवासी समाजाने काँग्रेसला भरभरून मतदान करून खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना निवडून आणले.अशी परिस्थिती मतदारसंघात असतांना बागलाण मतदार संघ राष्ट्रवादीला सोडल्यास येथील काँग्रेसचा पारंपारिक मतदार आदिवासी समाज नाराज होईल व परिणामी येथे महाविकास आघाडीस पुन्हा पराभवास सामोरे जावे लागेल.अशी तक्रार आदिवासी सेलचे बागलाण तालुकाध्यक्ष प्रवीण भील यांच्यासह आदिवासी काँग्रेस सेलच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.शिरीषभाऊ कोतवाल यांच्याकडे केली.यावेळी आदिवासी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस दिपक गवळी, ताहाराबाद शहर उपाध्यक्ष एकनाथ सोनवणे,आकाश भील,वाडीपिसोळचे माजी सरपंच वसंत अहिरे,बिजोट्याचे उपसरपंच बापु माळी, किशोर अंकुशे सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायकवाड,योगेश माळी,यांच्या सहीचे पत्र देऊन केली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलाणची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात यावी व प्रवीण भील यांच्या पक्षीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रवीण भील यांना उमेदवारी देण्यात यावी अशा आशयाचे पत्र देऊन आजपर्यंत केलेल्या विविध कामांची फाईल कोतवाल साहेबांकडे सुपूर्द करण्यात आली.