आशाताई बच्छाव
गरजूंना घरे बांधण्यासाठी शासकीय जागा द्यावी: राजवीर संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
मॉल मजुरी करणाऱ्या नागरिकांना घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच नजोलच्या जागेवर झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी राजवीर संघटनेचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर( पुतळा ईर्विन)चौक अमरावती येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहरातील विविध भागात अनेक गरीब, गरजू नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांच्या मागण्यासाठी राजवीर संघटनेच्या नेतृत्वात वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्यापही तोडगा काढला नसल्याचे आरोप संघटनेने केला,. मुस्लिम बहुल परिसरात नवसारी परिसरात डीपी स्कूल, महाविद्यालय, ट्रान्सपोर्ट, मुस्लिम कब्रस्तान, क्रीडा मैदान आदीसाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामनाथ खान, मोबीन खान, राजीव अब्दुल, निलेश इंगळे, अब्दुल राजिक, शाहीन खान, उपस्थित होते.