आशाताई बच्छाव
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत प्रमुख मागण्यासाठी शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण.
देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे
दि.13/08/2024.. जिल्हाधिकारी- कार्यालय- नांदेड प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेले देगलूर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावे, आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार केली नाही, त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागा कडे ऑफलाइन अर्ज दिला त्या शेतकऱ्यांना सुद्धा तात्काळ नुकसान भरपाई विमा मिळावा या अनुषंगावर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी शेतकरी पुत्र माधव पाटील केरुरे सुगावकर व अभय देशमुख, कावळगावकर, यांनी आमरण उपोषण करत आहेत, त्यांना शेतकरी वर्गातून पाठिंबा मष्णाजी शिरगिरे, सादिक मरखेलकर, हनमंत माळेगावकर उपोषणा ठिकाणी पाठिंबा दर्शविला आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आमरण उपोषण माघार घेणार नाही.