आशाताई बच्छाव
मानवाधिकार आयोगाच्या नावाने १५ लाखांनी गंडवले; तोतया पदाधिकाऱ्यांना अटक.
दैनिक युवा मराठा
पी.एन
देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती. (चांदुर रेल्वे)
दिल्ली स्थित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे पदाधिकारी असल्याची बातमी करून चांदुर रेल्वे येथील संजय ननोरे यांची तब्बल१५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तृतीया पदाधिकारी अनिल बन्सीलाल राठोड (रा. चांदुर रेल्वेजि.अमरावती.) व संदीप दादाराव राठोड (रा. पोहराबंदी जि अमरावती.) यांना अटक करण्यात आली आहे. संजय उर्फ बाळकृष्ण ननोरे यांची चांदुर रेल्वे हद्दीतील तुळजापूर शिवरात शेती आहे त्यांच्या जमिनीवर आवाजा कंपनीने सोलर प्रोजेक्ट लावले असून, त्याचा मोबदला कंपनीकडून मिळणे बाकी होते. मोबदल्यावरून मनोरे व कंपनीत काही वाद सुरू होता व त्यादरम्यान ननवरे यांची आरोपी अनिल राठोड व संदीप राठोड यांच्याशी भेट झाली. त्यांनी स्वतःची ओळख आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद, दिल्लीचे पदाधिकारी असल्याचे करून दिली. कंपनीसोबत लढणे ननवरे यांना व्यक्तिशः शक्य होणार नाही अशी खोटी बातमी करून त्याकरिता त्यांचे शेत राहुल महाजन नावाच्या व्यक्तीस सात लाख रुपयांमध्ये विक्री करण्यास भाग पाडले. दरम्यान, कंपनीकडून तक्रारदार ननवरे यांच्या बँक खात्यात जमिनीच्या मोबदल्यापोटी २२ लाख रुपये आले असता अनिल राठोड व संदीप राठोड यांनी कंपनीकडून एकूण ३३ लाख रुपये मिळवून देतो, त्याकरता आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषद दिल्लीच्या अध्यक्षांना पैसे पाठवावा लागतात, अशी खोटी बातवानि करून ननोरे यांच्याकडून१५ लाख रुपये केली. आरोपी विरुद्ध चांदुर रेल्वे येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राष्ट्रीय मानव अधिकार राज्य मानव अधिकार आयोग यांचे नाव, बोधचिन्ह, खोटे ओळखपत्र, लेटरहेड या बाबीशी हा धर्म ठेवून काही उत्साहन नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे या प्रकरणावरून दिसून आले आहे. सबब, नागरिकांनी अशावर विश्वास न ठेवता खोटी बातमी करून धमकावणी किंवा एखादे प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली खंडणी घेण्याचा प्रकार करीत असल्यास तसेच केला असल्यास संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्याचे आव्हान स्थानिक गुन्हा शाखाप्रमुख किरण वानखडे यांनी केले आहे.