आशाताई बच्छाव
गरिबांना दिल्या जाणाऱ्या पिशव्यांचे वाटप अजूनही १० टक्क्यावरच: साड्यांचे वाटपही २५ टक्के दूरच
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
सरकार तर्फे अंतोदय कुटुंबातील महिलांना दिल्या जाणाऱ्या साड्या आणि अंत्योदय सह प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना दिला जाणाऱ्या कापडी पिशव्यांचे वाटप अजूनही राखडले आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत केव्हा ९.७९ लाभार्थ्यापर्यंत पिशव्या पोहोचल्या. त्याचवेळी साड्यांचे वाटपही २५ टक्के लाभार्थ्यापासून दूरच आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य सरकारने अंतोदय रेशन कार्ड असलेल्या महिलांना साड्या व कापडी पिशव्या वितरित करण्याची घोषणा केली होती. भोसले नंतर लगेच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. रेशन दुकाना मार्फत या दोन्ही बाबी आभार त्यापर्यंत पोहोचविण्यात येत होत्या. परंतु मध्येच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि आचारसंहितेमुळे वितरण थांबविण्यात आले. आता आचारसंहिता संपुष्टात येऊन देखील एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. परंतु तरीही साड्या आणि कापडी पिशवीच्या वितरण व्यवस्थेने हवा तसा वेग घेतला नाही.दोन दिवसापूर्वी पर्यंत जिल्ह्यात झालेल्या साड्यांचे वाटप ७५.५८ टक्क्यावर पोचले असून कापडी पिशव्यांचे वाटप अवघे ९.७९ टक्क्यावरच थांबले आहे. त्यामुळे यंत्र नेने दोन्ही जिन्नसाच्या वितरणाची गती वाढवून किमान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते पुरी तरी साड्या व पिशव्यांचे वितरण करावे, अशी संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांची मागणी आहे साड्यांच्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख २७ हजार ४६५ असून कापडी पिशव्यांची आहे आमदार असल्याची संख्या ४ लाख ८५ हजार ४९० एवढी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ९५ हजार पीशव्या प्राप्त झाल्या. ऐकुन लाभार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या ६०.७६ टक्के एवढी आहे. मात्र वितरणाची गती रोड वाल्यामुळे वितरणाचे प्रमाण फक्त ९.७९ एवढ्यावरच थांबले आहे. लोकसभा निवडणुकीची दोन महिने चाललेल्या आचारसंहिता हे कमी वितरण मागची मूळ कारण आहे. यंत्रणाच्या मते एप्रिल आणि मे महिन्यात साड्या तसेच कापडी पिशव्यांचे वितरण करता आले नाही. दरम्यान ४ निकालानंतर आचारसंहिता दूर झाली. वेग घेतला असून येत्या काळात दोन्ही जिन्हसांचे वितरण पूर्णतत्त्वास जाईल. पाॅश मशीनचीही अडचण सध्या जिल्ह्याभरातील रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डच्या दुकानांमध्ये केवायसी चे काम सुरू आहे. त्यामुळे दुकानदारांना त्यांच्या नियमित कामाकाजातील आधीका अधिक वेळ यासाठी घ्यावा लागतो. शिवाय न असल्यास पाॅश मशीन मध्ये कोणतीही नोंद करता येत नाही. त्यामुळे साड्या आणि पिशव्यांचे वितरण झाले असले तरी त्यांच्या नोंदी अध्याप मशीनमध्ये उमटल्या नाहीत त्यामुळे एकूण टक्केवारी घसरलेली दिसुन येतो.