आशाताई बच्छाव
वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज.
रायगड जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकरांनी केले शेकडोच्या संख्येत वृक्षांची लागवड.
पोयनाड -विकी जाधव
वातावरणात सातत्याने बदल होत आहे, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे.पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे.
वन मोहोत्सव दिनाचे औचित्य साधून रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन च्या संलग्न असणारी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन आयोजित रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन जिल्हास्तरीय वृक्षारोपण अभियान आज 7 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 जांभूळ, बाभुळ, चिंच, गुलमोहर, निरगीली प्रमाणे जवळपास 50-60 झाडे लावण्यात आली. त्याच प्रमाणे रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन च्या संलग्न असणारी जिल्ह्यातील पेन, अलिबाग, पोयनाड, कर्जत, नेरळ, खोपोली, मुरुड, नागोठणे, पोलादपूर, महाड- बिरवाडी , पाली – सुधागड, माणगांव-इंदापूर ,म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यात देखील आजच्या दिवशी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.






