Home नाशिक खर्डे येथे मुसळधार पावसामुळे निवाने बारी घाटात दरड कोसळली

खर्डे येथे मुसळधार पावसामुळे निवाने बारी घाटात दरड कोसळली

147

आशाताई बच्छाव

1000495668.jpg

खर्डे येथे मुसळधार पावसामुळे निवाने बारी घाटात दरड कोसळली

सतीश सावंत- विभागीय प्रतिनिधी : कसमादे/ खर्डे (ता. देवळा) येथे सोमवारी (दि. 24) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, छोटे मोठे ओहोळ नाल्यांना पूर आला. मुलुखवाडी येथेही जोरदार पाऊस झाल्यावर निवाने बारी घाटात दरड कोसळली असून, वाहतूक ठप्प झाली आहे. खर्डे व परिसरात सुरुवातीला पेरणीयुक्त पाऊस झाला. पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला.
दरम्यान, सोमवारी दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दुपारी तीन वाजता मुसळधार पावसाने दिलासा दिला. मुलुखवाडी येथील पाझर तलाव पूर पाण्याने भरून गेला. खर्डेसह मुलुखवाडी येथे मुसळधार पाऊस झाला असून कधी नव्हे अशा ढगफुटी सदृश्य पावसाने शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. शेतातले बांध फुटल्याने नुकसान झाले. तसेच ओहळ, नाल्यांना देखील पूर आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मुलुखवाडी मोतीनंदर शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने येथील निवाने बारी घाटात दरड कोसळली. रस्त्यावर मोठ मोठे दगड येऊन पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुलुखवाडी शिवारात शेतात पाणी साचले असून येथील पाझर तलाव भरला. निवाने बरीत दरड कोसळली मात्र यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेऊन रस्ता वाहतुकीस खुला करावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद मोरे मुलुखवाडी येथील विठोबा चव्हाण यांनी केली आहे.

Previous articleआजचा शेतकरी कर्जबाजारी का झाला आहे ?
Next articleनाशिकमध्ये वर्गात चक्कर आल्याने सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.