Home नाशिक वादग्रस्त पत्रकांमुळे नाशिक मध्ये तणाव, पोलिसांच्या सजगतेने परिस्थिती नियंत्रणात

वादग्रस्त पत्रकांमुळे नाशिक मध्ये तणाव, पोलिसांच्या सजगतेने परिस्थिती नियंत्रणात

170

आशाताई बच्छाव

1000487972.jpg

वादग्रस्त पत्रकांमुळे नाशिक मध्ये तणाव, पोलिसांच्या सजगतेने परिस्थिती नियंत्रणात

प्रतिनिधी-सतीश सावंत
दिनांक- 22 जून 2024

दोन समाजांमध्ये मध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातील काही भागात वादग्रस्त पत्रके आढळली. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने नाशिकच्या पंचवटी परिसरात आज पहाटेच्या सुमारास काही वादग्रस्त पत्रके टाकण्यात आली. नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील फुलेनगर येथे हा प्रकार घडला असून या पत्रकांमध्ये विशिष्ट समाजाला हिणवण्याच्या उद्देशाने ही पत्रके तयार करण्यात आली होती. यामुळे नागरिक संतप्त झाले आणि या पत्रकांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती असल्याने काही काळ या भागात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
शहरातील हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघटने कडून ही पत्रके वाटण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे या विरोधात रिपाइचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, दीपक डोके, अर्जुन पगारे, प्रशांत जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना ही घटना घडली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत पुढील तपास केला. वैयक्तिक वादातून संबंधित व्यक्तीला अद्दल घडविण्यासाठी हा प्रकार घडवून आणण्याचे समोर आले आहे. तसेच या कथित पत्रकात एक इमारत देखील होती त्या इमारतीला इजा पोहोचविण्याचाही उद्देश असल्याचे दिसून आले.
तसेच शहरातील एका मंदिराबाहेर लावलेला स्तंभ काढावा अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही देण्यात आला होता. ही पत्रके आढळल्यानंतर त्यातील आक्षेपार्ह मजकुरामुळे नागरिक संतप्त झाले आणि या विरोधात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पंचवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत केले. सुमारे दोन तास हे प्रकरण सुरू होते ते संपूर्ण शहरात पसरल्याने अन्य भागातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसताच तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगत हे प्रकरण शांत केले. शहरात तणाव वाढू नये तसेच सामाजिक एकोप्याला बाधा पोहोचू नये यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय असून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन नाशिक शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous articleसाकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा
Next articleपांढरीपूल घाटात डांबराचा सडा अपघाताला निमंत्रण; संबंधित विभागाचे दुर्लक्ष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.