आशाताई बच्छाव
भूतलावरील उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे:- आमदार लहू कानडे….. श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक चार मधील अतिथी कॉलनी परिसरात स्वर्गीय खासदार गोविंदरावजी अदिक यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त भागाचे मा. नगरसेवक प्रकाश ढोकणे मित्र मंडळाच्या वतीने भव्य वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला. आमदार लहू कानडे म्हणाले की भूतलावर वाढत असलेली उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करण्याची अत्यंत गरज असून परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे काळाची गरज असल्याचे म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अदिक म्हणाले की अतिथी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याकरिता अदिक परिवाराकडून लागेल ते सहकार्य करू असे म्हणाल्या. यावेळी सेंट झेवियर स्कूलचे प्राचार्य फादर शिनगारे, अतिथी कॉलनीचे अध्यक्ष एडवोकेट बाबासाहेब मुठे, एडवोकेट विनोद तोरणे, लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष लहू खंडागळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष राजीव साळवे, सोनार संघटनेचे अध्यक्ष मनोज चिंतामणी, ख्रिस्ती परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, माजी नगरसेविका अनिता ढोकणे, अनघा लोंढे, स्वाती पाटील, जया दळवी,मॅडम, तात्यासाहेब सौंदाणे, तानाजी पाटील, सुनील सिनारे , विलास दळवी, गोपाल वायदेशकर, सुभाष लिंगायत, संजय जोर्वेकर, भालेराव दादा, संजय आल्हाट, अशपाक भाई शेख, बाळासाहेब पाटोळे सर, प्रदीप साळुंखे, आधी परिसरातील मान्यवर महिला भगिनी उपस्थित होते., उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले.