आशाताई बच्छाव
अमरावती विद्यापीठ चा निवडीत पुरस्कारघोळ.
__________
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार निवड प्रक्रिये गये प्रकार झाल्याचा आरोप शिक्षण मंचाने लावला आहे. या पोस्टार्थ मणक्याच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना निवेदन सादर केले असून निवड प्रक्रियेतील उनिवांची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षण मंचाच्या संयोजक मीनल भोंडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. विद्यापीठ तर्फे दरवर्षी १मेया स्थापना दिन उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्काराचे वितरण केले जाते. त्यासाठी सलग्नित महाविद्यालय आणि विद्यापीठ च्या विविध भागातील अधिकारी व कर्मचाऱ्याकडून प्रस्ताव मागवला जातात. यावर्षी ३१ मार्च पर्यंत असे प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु बहुतेक सर्वांना साठी अर्ज प्राप्त न झाल्याने समितीने त्यांच्या मर्जीतील निवडक महाविद्यालयाकडूनच प्रस्ताव मागवून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार घोषित केले. ही बाब विद्यापीठने ठरवून दिलेल्या निकष तसेच नियम अटींना डावलणारी असल्यामुळे पुरस्कार साठी अपात्र व्यक्तीची निवड करण्यात आली. किंवा होऊन पात्र व्यक्तींना पुरस्कारपासून मुद्दाम दूर ठेवल्या गेले असा शिक्षण मंचाचा आरोप आहे. विशेष असे की नियमबाह्य पद्धतीने परस्पर अर्ज मागवून समितीने मर्जीतील लोकांना पुरस्कार देण्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध गटासाठी ही योजना आहे. एक पुरुष एक महिला अशा प्रत्येक सर्वांगातील दोघं उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार प्राधान्य केला जातो. त्यासाठीच्या निवड समिती कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते हे अध्यक्षस्थानी आहे. तर नुटाचे अध्यक्ष डॉ प्रवीण रघुवंशी, विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख, प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. आर डी .सेकची आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.ए.बी.मराठे हे या समितीचे सदस्य आहेत. या समितीने दिलेल्या मुदतीनंतर म्हणजे 31 मार्चनंतर अर्ज मागविण्याचे पुरावे ही निवेदनकर्त्यांनी फुलगुरूच्या लक्षात आणून दिले आहे. नियमानुसार प्राप्त प्रस्तावाचे योग्य अवलोकन करून नकाशाच्या आधारे गुणकांकडून सर्वाधिक गुण असणाऱ्या अर्जदाराची निवड होणे अपेक्षित असते. मात्र समितीने केवळ अवलोकन करून आपल्याच मर्जीतील लोकांची निवड पुरस्कारासाठी केली असल्याची बाब शिक्षण मंचाने उघड केली आहे.1/2023 विनियेतील परिच्छेद,10 , मध्ये देण्यात आलेल्या विकासाचे उल्लंघन निवड समितीने केले असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमीतता झाल्याचे उघड झाले. तसेच कमी केले निकष धावले नाही, पुरस्कार साठी निवड करणाऱ्या समितीने नियमाचे योग्यरीत्या पालन केले आहे. सर्व कायदेशीर बाबी वाळूनच त्यांनी पुरस्कारांची निवड केली असे डॉ. मिलिंद बारहाते कुलगुरू सांगितले.