Home सामाजिक तारूण्याच्या उंबरठ्यावरील प्रेम  **************************

तारूण्याच्या उंबरठ्यावरील प्रेम  **************************

321

आशाताई बच्छाव

IMG_20240221_082646.jpg

तारूण्याच्या उंबरठ्यावरील प्रेम
**************************
प्रेम ही किती तरल,मनस्पर्शी भावना आहे.प्रपोज डे तुम्हाला साजरा करायचा असेल तर प्रथम तुम्ही खरच कुणाच्या प्रेमात आहात का हे स्वतः ला विचारणं खूप गरजेचं आहे.कारण काही लोक फक्त टाईमपास म्हणून या गोष्टी करतात.कुणाच्याही भावनांशी खेळणं चुकीचं आहे.कधीतरी कुठेतरी प्रत्येकाचा जीव जडला असणार.जीव जडून हुरहुरून प्रत्येकजण कधीतरी आपल्याच तंद्रीत नक्की फिरला असणार.पण सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही.कधी कधी प्रेमात नकारही पचवावा लागतो.मग अशावेळी होणारा मानसिक त्रास हळूहळू कमी करू शकतो.शारीरिक जखम भरून यायला वेळ लागते .तसेच मानसिक जखम भरून यायलाही वेळ लागतो.पण ती बरी होऊ शकते.काही प्रमाणात जखमा राहतील पण वेदना नक्कीच कालानुरूप गायब होतील.आपण खूप आशा बाळगतो की ती व्यक्ती आयुष्यात कधीतरी परतून येईल.पण असं होईलच असं नाही.आपण सकारात्मक विचार करावा.जर काही दिवसांनी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परतली तर ती व्यक्ती तुमचा एक ऑप्शन म्हणून वापर करत नसेल कशावरून? किंवा ती व्यक्ती कुणाकडून तरी हर्ट झाली म्हणून त्या व्यक्तीला तुमची किंमत कळलेली असेल.शिवाय तुमच्या मानसिक जखमा तोवर भरल्या असतील तर तुम्हाला त्या व्यक्तीला परत आयुष्यात स्वीकार करून जखमेवरच्या खपल्या परत काढायच्या का?हा प्रश्न मनाला विचारायला हवा.
आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुमच्या आयुष्यात तुमच्याहून महत्वाचं कोणीच नाही.मन मोकळं करायला पाहिजे तर रडून घ्या.पण एका मर्यादेनंतर स्वतः ला सांगा की आता बस.आता त्या व्यक्तीसाठी परत रडणार नाही.तुम्हाला जेव्हा खूप वाईट वाटत असेल तर तुमची आवडती पुस्तके वाचा, विनोदी चित्रपट पहा,सिरिअल्स बघा.अनेक प्रकारे तुम्ही स्वतः ला गुंतवून ठेवू शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.फिरायला जा,शाॅपिंगला जा, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारा.थोडक्यात, तुम्हाला जे जे करून आनंद होतो त्या-त्या गोष्टी करा.
तुम्ही जेव्हा दु:खात असता तेव्हा घेतलेले निर्णय बहुदा चुकीचे असतात.तुम्ही स्वतः वर आणि समोरच्या व्यक्तीवर अन्याय करण्याची दाट शक्यता असते.काही काळ कमिटमेंट आणि रिलेशनशिप पासून दूर रहा.तुम्हाला तुमच्या मनात येणारा त्या व्यक्तीचा विचार वेगळ्या विचाराने रिप्लेस करायचा आहे.हळूहळू तुमच्या मेंदूला ती सवय लागेल आणि तुम्ही स्वतः च्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकता.काळाचं मलम सर्व जखमांवर लागू पडतं.तुम्ही परत आयुष्यात खळखळून हसू शकाल.छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद वाटायला लागेल.
**************************
लैलेशा भुरे
नागपुर

Previous articleधावडे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य बहुउद्देशिय संस्था स्थापन
Next articleबचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी सर्व प्रकारे मदत करू –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.