आशाताई बच्छाव
सिबिल स्कोर मागितल्यास बँक विरुद्ध फौजदारी, देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.
अमरावती
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्ट
दैनिक युवा मराठा नेटवर्क
अमरावती पिक कर्जासाठी सिबिल स्कोर मागितल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पिक कर्जासाठी सिबिल स्कोर की आवश्यकता नाही. प्रसाद निर्णय एलएलबीसी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्जासाठी शिबिर कुमार मागितल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. खरीप हंगाम पूर्वी आढाव सभेसाठी फडणवीस येथील नियोजन भावनात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पिक कर्जासाठी सिबिल स्कोर ची वाट ठेवता येत नसल्याचा निर्णय झालेला आहे. तसेच परिपत्र आरबीआय ने काढले आहे. त्यामुळे नाईलाजाने एफ आय आर नोंदवाला लागणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात खरीप साठी बियाणेची उपलब्धता दोबारा पेरण्याची वेळ आल्यास आवश्यकतेपेक्षा २११ टक्के बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. याशिवाय ६५ टक्के शेतकरी घरचेच सोयाबीन बियाणे वापरत आहेत. त्यामुळे बाजारातून फक्त ३५ टक्के बियाणे शेतकरी घेणार आहे. याशिवाय गतवर्षीच्या तुलनेत यावेळी अधिक रसायनिक खतांची उपलब्धता असल्याने यंदाच्या खरीप मध्ये तुटवडा राहणार नसल्याचे अमरावती जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.