Home गडचिरोली राजोली येथे तालुकास्तरीय बाल संमेलन उत्साहात संपन्न!

राजोली येथे तालुकास्तरीय बाल संमेलन उत्साहात संपन्न!

161

आशाताई बच्छाव

1002335554.jpg

राजोली येथे तालुकास्तरीय बाल संमेलन उत्साहात संपन्न!

गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली:धानोरा तालुक्यातील राजोली येथे आयोजित तालुकास्तरीय बाल संमेलनात आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी चिमुकल्या दोस्तांशी मनमोकळा संवाद साधत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेली मोठी स्वप्ने आणि निरागस प्रश्न पाहून मन भरून आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

बालकांशी झालेल्या गप्पांमधून शिक्षण, कला आणि क्रीडा हे यशाचे महत्त्वाचे मार्ग असल्याचे अधोरेखित करत, आपल्या भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम संधी व योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा विश्वास आमदार डॉ. नरोटे यांनी व्यक्त केला. “हा स्नेह कायम राहो,” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांशी असलेले नाते अधिक दृढ केले.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. मनोहरजी पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. लताताई पुन्घाटी, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. साजनजी गुंडावार, गटशिक्षणाधिकारी सौ. हेमलताताई परसा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असून, या संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous articleचाळीसगाव फाट्यावर लोकशाही धडक मोर्चाच्या रास्तारोको आंदोलनास प्रचंड प्रतिसाद
Next articleनवेगाव (मूरखळा ) वार्ड क्रमांक 3 येथील घनकचरा विलगीकरण केंद्र नागरी वस्ती पासून दूर तयार करण्यात यावे!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.