Home भंडारा शारदा विद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांत समता, पावित्र्य आणि सृजनशीलतेचा संदेश

शारदा विद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांत समता, पावित्र्य आणि सृजनशीलतेचा संदेश

110
0

Yuva maratha news

1001809818.jpg

शारदा विद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांत समता, पावित्र्य आणि सृजनशीलतेचा संदेश

 

संजीव भांबोरे
भंडारा-तुमसर येथील शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथे
कार्यअनुभव–हस्तकला या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनाच्या निमित्ताने “राखी बनविणे” हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, नैतिक मूल्ये आणि सामाजिक समतेची भावना जागविणे हा होता.

राखी या केवळ सजावटीच्या वस्तू नसून ती भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व जिवाभावाचे प्रतीक आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी मनापासून अनुभवला. विद्यार्थी व विद्यार्थिनी – दोघांनीही राखी तयार केली, हे दृश्य समाजातील लिंगसमतेचा आदर्श ठरले. पवित्र सणाचे महत्त्व प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे व समाजात नैतिकतेची जपणूक व्हावी, हा दृष्टीकोन यामागे होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राहुल डोंगरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सहभागाचे मनापासून कौतुक करताना, “या उपक्रमातून समाजात समतेचा मार्ग प्रशस्त होतो,” असे प्रतिपादन केले.

शालेय कार्यक्रमांतर्गत शिक्षकवृंद ज्योती बालपांडे, दीपक गडपायले, संजय बावनकर, श्रीराम शेंडे, विद्या मस्के, नितुवर्षा मुकुर्णे, प्रीती सेलोकर, रूपराम हरडे,अशोक खंगार,अंकलेश तिजारे, सुकांक्षा भुरे,अतुल भिवगडे, बेनिता रंगारी, दीपक बालपांडे, नारायण मोहनकर आदिनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांना योग्य वाव मिळाला असून, शहरात या उपक्रमाची प्रशंसा होत आहे. रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाच्या निमित्ताने सृजनशीलता, पावित्र्य आणि समाजिक एकतेचा संदेश देण्याचा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे.

Previous articleविरदेल येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा……
Next articleअड्याळ येथे पोलीस व डॉक्टर बंधूंना सुरक्षाबंध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here