आशाताई बच्छाव
मुंगळा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी.
सततच्या पावसामुळे संत्राला मृग बहार धरला नाही…
मुंगळा / वाशिम प्रतिनिधी गोपाल तिवारी:- मुंगळा परिसरात मागील तीन वर्षापासून वेळोवेळी आलेल्या पावसामुळे संत्रा उत्पादक अडचणीत सापडला आहे मागील वर्षी मे महिन्यात सतत पाऊस सुरू असल्यामुळे मृगबहाराला फटका बसला आहे.यामुळे मुंगळा येथील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणी सापडला असून शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शासनाकडे मुंगळा येथील जगदंबा बचत गटाने निवेदनाद्वारे केली आहे.
मुंगळा परिसरात जवळपास ६००ते ७०० हेक्टर संत्रा लागवड असून मुंगळा येथील शेतकऱ्याचे संत्रा हे मुख्य पीक आहे व संत्रा बहार निसर्गावर अवलंबून असून केव्हा निसर्ग शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालेल याला सांगता येत नाही. असाच प्रकार मुंगळा येथील संत्रा उत्पादकाचा झाला आहे.
नुकतेच संत्राचे उन्हाळी पाणी बंद करून संत्रा बागा में महिन्यात तानावर सोडल्या होत्या. परंतु मागील तीन वर्षापासून वेळेअवेळी आलेल्या पावसाचा फटका मृग बहाराला बसत आहे.तसेच यावर्षी में महिन्यात सतत १महिना संतत पाऊस सुरू होता. यामुळेच संत्रा मृग बहाराला बसला असून येथील तसेच मालेगाव तालुक्यातील सर्व संत्रा उत्पादक अडचणीत सापडला आहे तरी शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जगदंबा कृषी बचत गटाने रिसोड मालेगाव चे आमदार अमित झनक तसेच जिल्हा अधिकारी, तहसीलदार मालेगाव यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी जगदंबा बचत गाटाचे शेतकरी प्रकाश राऊत, गजानन केळे,अनंद नाईक, जनार्दन जायभाये, संदिप बोबडे, भागवत मोहळे, संतोष बबन राऊत, सिदेश्र्वर केळे,तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते….






