आशाताई बच्छाव
आईचा मृत्यूशी दोन हात, लेक मात्र गमावला
तब्बल २४ तास झुंज ; तर निष्पाप बाळाचा बळी ; कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर ;
शंकरपूर गावात शोककळा
संजीव भांबोरे
भंडारा – (साकोली) “तुझ्याविना जगणे, म्हणजे पाण्याविना मासा. अश्रूंचा बांध फुटला, आता थांबणार कसा” आई म्हणजे लेकराची माय. तर वासराची गाय असते. आई म्हणजे दुधावरची साय, तर लंगड्याचा पाय असते. एवढचं नव्हे तर आई म्हणजे धरणीची ठाय असते. आईसाठी तिचे बाळ हे तिचे जग असते पण जेव्हा आपल्या पोटचं बाळं आई गमावते तेव्हा मात्र तिचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीणचं. ते या अत्यंत केविलवाण्या घटनेतून दिसून येत आहे.
जणू असचं काही घडलं व सगळं होत्याच नव्हतं झालं. तालुक्यातील ग्रा. पं. वडेगांव अंतर्गत येणारे पन्नास ते साठ वस्तीचं छोटस आदिवासी गांव वार्ड क्र. ०३ म्हणजेच शंकरपुर. गावात आदिवासी समाज जास्त असला तरी इतर समाजाचे लोकही गुण्यायगोविंदाने एकत्रित राहून स्वतःचा संसार चालवित होते. मात्र; अंगणवाडी मदतनीस पदाची भरती निघाली आणि गावाला काळाजी नजर लागली. फेब्रुवारी २०२५ ला एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र अवैध पद्धतीने भरती प्रक्रिया राबविल्याने गावकऱ्यांना ती मान्य नव्हती. न्यायासाठी या कार्यालयातून त्या कार्यालयात जाऊन गावकरी अधिकाऱ्यांना विनवणी करायचे. चार महिने लोटले मात्र पदरात यश पडले नाही. अधिकाऱ्यांच्या अन्यायामुळे अत्याचार आपल्या सीमा ओलांडत होता. दरम्यान एका चार महिन्यांच्या गर्भवती मातेला त्रास व वेदना झाल्या असता तिने आपल्या पतीसह उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र बाळाचे गर्भातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले व पालकांना त्याचा जणू धक्काच बसला. बाळंतपणासाठी सलग २४ तासांचा विलंब करावा लागला असून आईनी आपल्या बाळासाठी आपला जीव पणाला लावला. मात्र गर्भातील चार महिन्यांचे बाळ जगणार तरी कसे.? शेवटी आईने बाळ गमावलं व जणू एक हंबरडाचं फोडला. सलग ७२ तासांनी डॉक्टरांनी आईला दवाखान्याची रजा दिली. मात्र गावात शोककळा पसरली आहे. तर या संपूर्ण प्रकरणात जो कुणी दोषी आहे त्यावर कठोर शिक्षा व्हावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.