Home नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कु. गितांजली मडके ला राज्यस्तरीय सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कु. गितांजली मडके ला राज्यस्तरीय सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रदान

52
0

आशाताई बच्छाव

1001591748.jpg

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कु. गितांजली मडके ला राज्यस्तरीय सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रदान

दैनिक युवा मराठा
निफाड (नाशिक) तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक चा २७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी बीएएमएस अंतर्गत राज्यस्तरीय “उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार २०२५” साठी प्रवरा मेडीकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय, शेवगाव ची विद्यार्थीनी कु.गितांजली अप्पासाहेब मडके चतुर्थ वर्ष बी. ए.एम.एस हिची निवड झाली .
हा पुरस्कार विद्यापीठाच्या वर्धापनदिनी प्रमुख अतिथी मा.खासदार डॉ. अजित एम.गोपछडे (सदस्य ,राज्यसभा ), लेफ्टनंट जर्नल राजीव कानिटकर (पी.व्ही.एस. एम,
ए. व्ही. एस. एम,व्ही. एस. एम,एस. एम.),मा.डॉ. विकी मोहनलाल रुघवणी (प्रशासक, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई), कार्यक्रमाच्या अध्यक्षा लेफ्टनंट जर्नल डॉ.माधुरी कानिटकर मॅडम (पी.व्ही.एस. एम,‌ ए. व्ही. एस. एम,व्ही. एस. एम.) (कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) प्रो.डॉ. मिलिंद निकुंभ सर (प्रतिकुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक), डॉ.राजेंद्र शिवाजी बंगाल (कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक )यांच्या हस्ते हा पुरस्कार गितांजलीस प्रदान करण्यात आला व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी गितांजलीला कायम मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. गीतांजली कारले मॅडम ( रिसर्च डिपार्टमेंट प्रमुख,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक) देखील उपस्थित होत्या व त्यांनी अभिमानाने स्वतःची विद्यार्थिनी म्हणून गितांजलीचे अभिनंदन केले.
ह्या प्रसंगाची साक्षीदार बनुन प्रवरा मेडीकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय शेवगाव चे नावलौकिक राज्यस्तरावर केल्याबद्दल प्रवरा मेडीकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय शेवगाव चे संचालक मा. पंजाबराव आहेर सर,प्रवरा मेडीकल ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय , शेवगाव चे प्राचार्य डॉ. संतोष पवळे सर, अकॅडमी इन्चार्ज डॉ.रेणुका सूर्यवंशी मॅडम,चतुर्थ वर्ष समन्वयक डॉ. सुमेध वासनिक सर आणि सर्व प्रथम वर्ष ते चतुर्थ वर्ष बी. ए. एम. एस. च्या गुरुजनांकडून गितांजली चे अभिनंदन करण्यात आले. तसेच समस्थ गदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने देखिल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
गितांजलीला मिळालेल्या सर्व यशाचे श्रेय गितांजलीने तिचे आई-वडील, भाऊ , कुटुंब, संपूर्ण गाव ,शाळेपासून तर कॉलेजपर्यंतच्या सर्व आदरणीय शिक्षक वृंदांना व कायम सपोर्ट करणाऱ्या सीनियर्स व बॅचमेट्सला दिले.जे एक स्वप्न मी पाहिलं होतं, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जर्नल माधुरी कानिटकर मॅडम यांना भेटण्याचं आणि त्यांच्या हातून बक्षीस स्वीकारण्याचे ते आज पूर्ण झालं आणि त्यासाठी मी कृतज्ञ आहे,त्यांच्याकडून खूप काही शिकायलाही मिळालं अशी बक्षीस स्वीकारताना गितांजलीची भावना होती.
आयुष्यात प्रगती करताना सर्वांना मदत करत सर्वांसोबत प्रेमाने व आपुलकीने वागत आपले कर्तव्य पार पाडत राहणे व त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हे जीवनातील यशाचे गमक आहे याची त्याप्रसंगी गितांजलीला प्रचिती आली, असे तिने नमूद केले.
“आज मी जे काही आहे ते सर्व माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे व माझ्या शिक्षक वृंदांच्या आशीर्वादामुळेच आहे” हे कृतज्ञतापूर्वक तिने सांगितले.जिद्द असावी स्वतः सोबत लढण्याची आणि स्वतःला येणाऱ्या सर्व आव्हांनासाठी सक्षम बनविण्याची, लढण्याची धडपडण्याची, पडण्याची आणि परत स्वतःच्या पायावर उभा राहून यशाची उत्तुंग भरारी घेण्याची, समाजसेवेची.”
वरील हितवचनांचे पालन करून प्रत्येक गोष्टीत मेहनत करत व उत्तुंग भरारी आमच्या गावच्या कन्येने घ्यावी अशीच आमच्या सर्व गदेवाडी ग्रामस्थांची इच्छा आहे. याप्रसंगी संपूर्ण गदेवाडी ग्रामपंचायत गितांजलीचे मनापासून अभिनंदन करत आहे.

Previous articleपिंपळनारे गावात कृषीदूतांचे आगमन
Next articleअहमदाबाद मध्ये २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here