Home जालना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड....

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत

32
0

आशाताई बच्छाव

1001564161.jpg

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सैनिकांना निवडून आणावे असे आवाहन एडवोकेट सुभाष राऊत यांनी केले आहे. आज दि. 3 रोजी झालेल्या सावतामाळी भवन रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सर्वप्रथम स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. सदरील बैठक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर व शहराध्यक्ष दिपक वैद्य यांनी केले होते.
यावेळी या कार्यक्रमाला कैकाडी समाजाचे जेष्ठ नेते बाबुराव जाधव, जय भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे, मुस्लिम समाजाचे नेते अन्वरमिर्जा बेग, धनगर समाजाचे नेते शिवप्रकाश चितळकर, रिपाईचे नेते महेंद्र रत्नपारखे, राष्ट्रवादीचे अण्णासाहेब चित्तेकर, रमेश मुळे, राजु पवार, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राधाकिसन माने, त्र्यंबकराव हजारे, रवी उकीर्डे, रखुनाथ खैरे, जग्गनाथ रासवे,गणेश पाऊलबुध्ये, नितीन कानडे, सुंदरराव कुदळे, विष्णू पाडुळक्कर, संतोष डोंगरखोस,बाबासाहेब वानखेडे, दशरथ तोंडुळे,शंकर सातपुते, आनंद धोत्रे,मनोज धानुरे,नितीन इंगळे,मंगल नांगरे,विजय खंदारे, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष विलास शिंदे, ज्ञानेश्वर खरात, अक्षय कोरडे, पप्पू जिवणे, भगवान पाटोळे, नंदू जाधव,विलास खैरे,अशोक घनवट, शंभु बनकर,आशिष शेजवळ, आकाश वैद्य, स्वप्नील श्रीसुंदर, शुभम खंदारे, आकाश कसबे, विशाल शिंदे, आदित्य शिंगणे, गणेश राऊत, दुर्वास फटिंग, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here