आशाताई बच्छाव
दुर्दैवी…! शेततळ्यात बुडून तिघा चिमुकल्या बहीण-भावांचा मृत्यूः काल सकाळपासून होते बेपत्ता; आज सकाळी पाण्यावर तरंगले मृतदेह ! कोनड जवळची घटना…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा मंदिरात देवदर्शनसाठी गेलेल्या तिघा चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज, ३ जूनच्या सकाळी विदर्भ मराठवाडा सीमेवर असणाऱ्या कोनड बु शिवारात ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. मृत्यू झालेले तिघेही चिमुकले वरूड (ता. जाफ्राबाद) येथील आहेत.. तिघेही एकाच कुटुंबातील असून दोघे सख्खे बहिण भाऊ तर तिसरा चुलत भाऊ आहे. यश अनिल जोशी (१४), दिपाली रमण जोशी (९), रोहन रमण जोशी (७) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार तिघे भावंड काल, २ जून रोजी सकाळी ओलांडा महादेव येथे दर्शनासाठी गेले होते. मात्र ते परत आले नाहीत..पोलिसात बेपत्ता होण्याची तक्रार..
दरम्यान तिघे चिमुकले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य बेचैन होते. सगळीकडे गावकऱ्यांनी शोधाश केली, अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात
होते. सगळीकडे गावकऱ्यांनी शोधाशोध केली, अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला होता.
अखेर आज ३ जूनच्या पहाटे कोनड बु ते जाफ्राबाद रस्त्यावरील सुभाष परिहार यांच्या शेततळ्यात तिघांची मृतदेह तरंगलेले आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे…