आशाताई बच्छाव
अमृताचे चांदणे प्रमाणे धडपड करणारा ,अन्याय झालेल्या लोकांना मायेची फुंकर देणारा कार्यकर्ता म्हणजे संजीव भांबोरे
यांच्या 9 जून वाढदिवसानिमित्त विशेष लेख
भारत हा अनेक संस्कृती परंपरांनी नटलेला देश आणि त्यात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयन संस्कृती आणखीन विशेष त्यामध्येही विदर्भीय प्रभाग हा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण लोकजीवन पद्धतीने नटलेला आहे. विदर्भ म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतोच दुष्काळी भाग .ग्रामीण भागातील अवस्था आणि या अवस्थेतून परिवर्तन घडवून आणणारी काहीजण. या काही जणांमध्येच वैशिष्ट्यपूर्णरित्या आपल्या अनोख्या शैलीने समाजासाठी देश हितासाठी झटणारा एक सच्चा दिलाचा, दमदार, सडेतोड, निर्भीड निरपेक्ष, निस्वार्थ असा एक माणुसकीचा माणूस ज्याला म्हणता येईल ते म्हणजे आदरणीय पत्रकार संजीवजी भांबोरे. संजीवजी म्हणजे नावाप्रमाणे समाजासाठी असलेली एक संजीवनी आहे. या संजीवजी च्या कार्यातील संजीवनीने समाजातील अनेक दुर्बल घटकांना उपेक्षित जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे .आणि या न्यायातून संघर्षातून त्या लोकांना नवीन जीवन प्राप्त झालेले आहे. भंडारा जिल्ह्यातील पहेला येथील मूळ गावचे रहवासी असलेल्या पंचक्रोशीत भागामध्ये दीनदुबळ्या ,वंचित घटकांसाठी लढणारा, अहिंसा मार्गाने सत्याची तलवार म्हणजेच लेखणी चालवणारा अवलिया , हूर हुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजेच संजीवजी भांबोरे. सामाजिक प्रश्न कुठलाही असो मग त्यामध्ये आरोग्य , वीज, पाणी, स्वच्छता शिक्षण ,अधिकार, हक्क, महिलांचे प्रश्न या बाबतीत जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा आणि कुठल्याही राजकीय दबावासमोर न झुकणारा पत्रकार म्हणून संजीवजी भांबोरे यांना ओळखलं जातं. आज हा लेख लिहिण्यामागचा अंतकरणापासून प्रामाणिक प्रयत्न एवढ्यासाठीच की कुठल्याही आर्थिक फायद्यासाठी किंवा कुठल्यातरी पदाच्या लोभासाठी काम न करता फक्त आणि फक्त निस्वार्थपणे हा देह माणूस म्हणून मिळाला आहे तर माणुसकीसाठी माणसांसाठी जेही चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे करता येईल ते परिवर्तन करण्याचा प्रयत्न संजीवजी भांबोरे करत असतात आणि त्यांच्या या कार्याबद्दल लिहिण्याचा छोटासा प्रयत्न मी करतो आहे. आणि प्रसंग आहे आदरणीय भांबोरे साहेबांचा वाढदिवस त्यांना या माझ्या लेखनातून शुभेच्छा देण्याचा मी हा प्रयत्न करतो आहे. परिवर्तन करण्यासाठी स्वतः झिजावं लागतं आणि हे झिजणं चंदनाला जमतं. जे खरं सोन असतं त्या खऱ्या सोन्यालाच वितळावं लागतं चटके सहन करावे लागतात आणि तेव्हाच त्याचं परिवर्तन दागिन्यांमध्ये होतं. आणि समाजातील असाच खरा सोना म्हणून संजीवजी भांबोरे साहेबांचं कार्य चालू आहे आणि या कार्याला सध्या चटके जरी बसत असतील तर एक दिवस समाजामध्ये सर्वांगीण परिवर्तन आणण्याचं काम भांबोरे साहेबांच्या हातून होईल. वाढदिवस म्हणून नुसते डीजे लावून तरुणाईच्या घशामध्ये मादक द्रव्य ओतून वाढदिवस साजरा करणारे ही अनेक समाजसेवक आपण पाहतो. परंतु समाजहितासाठी समाजाचं भविष्य बदलवण्यासाठी समाजामध्ये खरी क्रांती घडवून आणण्यासाठी भांबोरे साहेब स्वतः अनेक परिवर्तनशील उपक्रम राबवत असतात आणि त्यांचे सहकारी त्यामध्ये सहभागी होतात. यामध्ये विशेषतः रक्तदान जे की सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखले जाते आणि यामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळतो. वृक्षारोपणाचा कार्यक्रम कारण समाजाला उत्तम ऑक्सिजनची गरज आहे ऑक्सिजन शिवाय माणूस जगू शकत नाही आणि या जीवाला अत्यावशक असणाऱ्या ऑक्सिजन साठी वृक्षारोपण फार महत्त्वाचा आहे हे आपण सगळ्यांनी कोरोना सारख्या दुर्धर आजारामध्ये अनुभवलं होतं म्हणून भविष्यातील फळ, फूल, सावली देऊन समृद्ध करणारा वृक्षारोपणाचा उत्तम कार्य वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत. त्यासोबतच समाजाला बदलण्यासाठी सर्वप्रथम त्यांची दृष्टी बदलवणे गरजेचे असते आणि त्याचाच तात्पर्य म्हणून की काय मोफत नेत्र रोग तपासणीची सुद्धा सुविधा वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागामध्ये देण्यात येते. आमच्या संजीव जी भांबोरे साहेबांचं एक विधान आहे आणि त्याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुद्धा झाली की सन्मान द्या आणि सन्मान घ्या. नुसत्या पुस्तके वाचून किंवा मी फुले ,शाहू, आंबेडकर यांचा अनुयायी असं सांगत बसण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा त्यांच्या कार्याचा वसा श्वासात आणि रक्ताच्या थेंबा थेंबात घेऊन त्याप्रमाणे समाजहितासाठी काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता म्हणून संजीवजी भांबोरे साहेबांची ओळख सध्या भंडारा जिल्ह्यात निर्माण झाली आहे. तसेच यावर्षी लोक सहभागातून सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत समाजात साहित्यिक, लेखक, कवी ,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार असे एकूण 70 कार्यकर्त्यांचा 9 जून 2025 रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून सत्कार करण्याचे ठरवण्यात आलेले आहे. ही मंडळी सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील असतात पण समाजात योग्य स्थान मिळत नाही अशावेळी त्यांच्या सुद्धा सत्कार कुठेतरी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून निव्वळ वाढदिवसच नव्हे वाढदिवस हे निमित्त आहे परंतु अशा समाजातील खऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला पाहिजे या दिशेने हे एक पाऊल आहे .इतकेच नव्हे तर समाजातील लोकांना भारतीय संविधाना बद्दल जाणीव व्हावी याकरिता 22 कार्यकर्त्यांना या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय संविधान भेटरुपी देणार आहेत. अशाप्रकारे दुःखी, कष्टी ,अन्याय झालेल्या लोकांना मायेची फुंकर देणारा त्यांच्यावरती आलेल्या अंधाऱ्या जीवनात अमृताचे चांदणे होऊन त्यांचा मार्ग सुखकर आणि प्रकाशमय करण्याचं काम पत्रकार संजीवजी भांबोरे साहेब करत आहेत. समाजात परिवर्तन करायचं असेल तर आधी स्वतःच्या आचरनामध्ये परिवर्तन करावं लागतं स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो आणि असाच हा दृढ विश्वासी समाजसेवक आपल्यातलाच आहे याचं मला फार कौतुक वाटतं. आजचा संघर्ष उद्या समाजामध्ये सामर्थ्य निर्माण करत असतो. त्यांच्या या अद्वितीय कार्यप्रणालीला प्रयत्नांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप मकरंदमय हार्दिक शुभेच्छा
कवी प्रा.मकरंद पाटील टाकळीकर
विद्यार्थी समुपदेशक जळगाव
7588151675