Home नांदेड आमदार जितेश अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न.

आमदार जितेश अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न.

11
0

आशाताई बच्छाव

1001557304.jpg

आमदार जितेश अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर –खरीप हंगाम 2025 च्या तयारीसाठीची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन तालुका कृषी अधिकारी देगलूर व पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी शंकराव चव्हाण सभागृह पंचायत समिती देगलूर येथे आयोजित केले होते सदरील बैठक माननीय आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आली होती ,सदरील बैठकीमध्ये खरीप हंगामाच्या तयारीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, खते, बियाणे, कीटकनाशके याबाबत माहिती जनजागृती व आढावा घेण्यात आला ,सदरील बैठकीसाठी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र विक्रेते ,शेतकरी व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
सध्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडत असून शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी, तालुक्यामध्ये उपलब्ध असलेले खते, बियाणे व तालुक्याच्या पेरणी क्षेत्राप्रमाणे लागणारे खते बियाणे इत्यादी बाबतचा सखोल आढावा बैठकीत घेण्यात आलाआहे
सदरील बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल गीते तसेच कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड डॉक्टर नीलकुमार ऐतवाडे उपस्थित होते
आढावा बैठकीमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी ,मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे लागवड तंत्रज्ञान बीज प्रक्रिया बियाणे उगवण क्षमता बेडवर सोयाबीन लागवड करणे टोकन पद्धतीने लागवड करणे प्रति एकर होणारा उत्पादन खर्च कमी करणे सोबतच घरचे बियाणे वापरण्यासाठी घ्यावयाची काळजी दुकानातून खरेदी करण्यात आलेल्या बियाण्याची सुद्धा उगवण क्षमता तपासणी करणे इत्यादी बाबतचे प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी बैठकीमध्ये शेतकऱ्यांना करून दाखविले. आहे सोबतच तालुक्यातील महत्त्वाचे पीक सोयाबीन त्यानंतर तुर कापूस मूग उडीद पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाबाबत तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी बैठकीत माहिती दिली शेतकऱ्यांनी शंभर टक्के बीज प्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करावेत, जमिनीमध्ये 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये ,हुमणी कीड नियंत्रण ,शंखि गोगलगाय किड नियंत्रण ,तुरीमध्ये गोदावरी वाणाचा वापर ,कोरडवाहू मध्ये बीडीयन 711 या तुरीचा वापर, शेंडा खुडणी तसेच तूरीवर येणाऱ्या रोग व किडी बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे ,
सध्या तालुक्यामध्ये तीन क्रमांकाचे पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जाते कापूस पिकामध्ये दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर कोरडवाहू क्षेत्रासाठी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये प्रति एकर राहणारी रोपांची संख्या ,लागवडीचे अंतर कापूस पिका मधील फळ फांदी व गळ फांदी याची ओळख ,गळफांदी काढून टाकण्याबाबतची शिफारस, कापूस पिकाची उंची तसेच बोंडसड होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी केले त्यांनी तालुक्यातील मागील वर्ष 2024 25 चा लेखाजोखा प्रास्ताविकामध्ये मांडण्यात आला त्यामध्ये मागील वर्षी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या सुविधा, विविध योजना, मागील वर्षी पेरणी क्षेत्र मागील वर्षीच उपलब्ध खताचा साठा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये झालेली लागवड ,एम आर ई इ जी एस योजने अंतर्गत झालेली लागवड , तालुक्याचे भौगोलिक रचनेनुसार तालुक्याचे बलस्थाने, तालुक्यातील संधी, तालुक्यातील कमकुवत बाजू व तालुक्यातील धोके कृषी क्षेत्राशी संबंधित इत्यादी बाबत सविस्तर सादरीकरण तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये करण्यात आले .सोबतच तालुक्यात पडणारा पाऊस, पावसातील खंड ,गतवर्षी झालेली अतिवृष्टी, अतिवृष्टीचे अनुदान वितरण ,गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला देण्यात आलेला लाभ, प्रलंबित प्रकरणे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत सुरू असलेली कार्यवाही ,योजनेची अंमलबजावणी इत्यादी बाबत आढावा देण्यात आला.

उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणी बाबत सुरू असलेली कार्यपद्धती तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच महाडीबीटी पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याबाबत सुरु असलेली पद्धती तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांनी महाडीबीटी पोर्टलवर करावयाचे अर्ज ,प्रमाणित बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर करावयाचे अर्ज इत्यादी बाबत माहिती दिली आणि तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड करावी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी फळ पिकाकडे वळावेत याबाबत उपस्थित त्यांना संबोधित केले पंचायत समिती कृषी अधिकारी लहाने शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
कृषी विकास अधिकारी यांनी कृषी सेवा केंद्र यांनी विक्री करताना घ्यावयाची काळजी शेतकऱ्यांना योग्य बिले देणे, लॉट नंबर नमूद करणे ,खत व बियाण्याचा उपलब्ध असलेला साठा साठा नोंदवहीत अद्यावत करणे ,सोबतच रासायनिक खताचे दुकानात उपलब्ध असलेले खते त्यांची उपलब्ध असलेली साठा व किंमत दर्शनीय भागामध्ये लावणे,q प्रत्येक दुकानांमध्ये तालुकास्तरीय गुण नियंत्रण भरारी पथक समिती यांचे बॅनर प्रदर्शित करणे, तसेच कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना खतासोबत बळजबरीने इतर खते व लिंकिंग न करता विक्री करणे इत्यादी बाबत स्पष्टशब्दांमध्ये आदेशित केले आहे सदरील आदेशाचे पालन न झाल्यास अत्यावश्यक सेवा कायदा अंतर्गत व रासायनिक खते अधिनियम अंतर्गत निविष्ठा विक्रेते यांच्यावर विक्री परवाना रद्द करणे व गुन्हे नोंद करण्याची तरतूद असल्याबाबतचे सुद्धा बैठकीत आदेशित केले आहे, तालुक्यामध्ये डीएपी खताचा तुटवडा असल्याबाबत कळविले आहे त्यासोबतच कोणत्याही विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या खताचा तुटवडा न करता उपलब्ध असलेले सर्व खते विक्री करण्याबाबत आदेशित केले आहे शेतकऱ्यांनी एकाच प्रकारच्या खताची मागणी न करता ती अन्नद्रव्य उपलब्ध असलेल्या इतर ग्रेडची खते वापरावी याबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.

माननीय आमदार जितेश अंतापुरकर यांनी कृषी विभागांनी शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे सर्व निविष्ठा कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची गैरसोय न होता उपलब्ध करून देण्याबाबत आदेशित केले आहे उपलब्ध असणाऱ्या निष्ठांची कृषी सेवा केंद्र यांच्याकडून अडवणूक न होता शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी भरारी पथकांनी अधिक तत्पर होऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत ,तसेच कृषी विभागाशी संबंधित पिक विमा योजना ,प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पिकाच्या नियोजनाबाबत जनजागृती करणे ,शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी विद्यापीठाच्या नवीन वाणाची शिफारस कृषी विभागाच्या विविध मोहीम शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती देण्याबाबत बैठकीत आदेशित केले आहे, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांना देण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात
कृषी विज्ञान केंद्र व विद्यापीठाच्या तज्ञाकडून खरीप हंगामासाठी पीक निवड पेरणी पद्धत इत्यादी बाबत तांत्रिक मार्गदर्शनाचे उपक्रम राबवावेत
बियाणे खते विक्रेत्यांचे परवाने तपासणी दरपत्रक लावणे स्टॉक तपासणी यावर कृषी विभागाने विशेष लक्ष देणे
कृषी निविष्ठावरील देखरेख प्रभावीपणे झाली पाहिजे
शेतकऱ्यांना खतांच्या काळया बाजारापासून वाचवण्यासाठी यंत्रणा सक्रिय करणे इत्यादी बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत

सध्या कृषी विभागाने करत असलेल्या कामांमध्ये आमदारांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर कृषी विभागाच्या शासकीय जागेवर कृषी भवन उभारण्याबाबत प्रयत्न करत असल्याबाबतचे बैठकीमध्ये सांगण्यात आले
सदरील कार्यक्रमासाठी अभय देशमुख ,प्रशांत पाटील आचेगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यादवराव संग्राम देसाई, बसवंतराव गोपछडे, पप्पू रेड्डी माजी पंचायत समिती सदस्य , यशवंत सूर्यवंशी उपसरपंच वळग , श्री वामन रेडी, अरविंद घुमडे,
कृषी सेवा केंद्र संचालक प्रवीण अचिंतलवार ,शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी, उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनकांबळे मंडळ कृषी अधिकारी देगलूर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी, शैलेश देशमुख, नवनाथ वल्कले, बंडीवार, सरकाळे, एस मोड, धनासुरे, सूर्यवंशी, माने, राजू सोनकांबळे, विकी गायकवाड, पंढरी गायकवाड, पोतदार, टेकमाळे,पुष्पलवार मॅडम, मंकावर मॅडम, यांनावार मॅडम , तोटावर मॅडमसह सर्व सहाय्यक कृषी अधिकारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संजय आचमारे, संगणक चालक जाधव, संतोडे, उप कृषी अधिकारी सुरेश कावटवाड, मुक्तांजली जामखंडे, बालाजी बोडके, कल्पना चोंडे, बालाजी भुरे, मंडळ कृषी अधिकारी गिरीधर बोडके इत्यादी सह सर्व कृषी विभागाची टीम मेहनत घेतली आहे शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी सुरेश कावटवाड यांनी केले.

Previous articleरयत क्रांती संघटनेच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराला सुरुवात…!
Next articleपिंपळगाव बसवंत येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here