आशाताई बच्छाव
शिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुव्यवस्थित करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळा
भाजपा पदाधिकाऱ्यांची निवेदनातून मागणी
(विरदेल / शिंदखेडा प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ कंपनीचे वरिष्ठ अभियंता यांच्याकडे शिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शिखेडा शहरात मागील महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरु आहे.आपण पुरवठा करीत असलेल्या विजेच्या प्रश्न शिंदखेडा शहरासाठी गंभीर होत चालला असून त्याचा भडका कधीही होऊ शकतो.
शिंदखेडा शहरात दररोज 6 ते 8 तास वीज बंद असते.आपण विजेचा पुरवठा व्यवस्थित करीत नसल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. शहरातील नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो. कारण नळ येतात त्यावेळी विजेची बत्ती गुल असते. परिणामी शहारातील नागरिकांना नळ असून पाणी नाही अशी गत होत आहे.यासंदर्भात लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांची समस्या सोडवावी अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण स्वतः व आपले वीज मंडळ जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. प्रसंगी अभियंता कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्याशी भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी यांनी फोनवर संवाद साधला होता. त्यांच्या अनुपस्थितीत लेखापाल जी एल नरवाड यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष भिला पाटील, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी,भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन,भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी,माजी नगरसेवक विनोद पाटील,दीपक चौधरी,चेतन परमार,सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार,उपशिक्षक जतिन बोरसे आदी.उपस्थित होते.