Home उतर महाराष्ट्र शिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुव्यवस्थित करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळा

शिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुव्यवस्थित करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळा

42
0

आशाताई बच्छाव

1001551073.jpg

शिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुव्यवस्थित करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळा

भाजपा पदाधिकाऱ्यांची निवेदनातून मागणी

(विरदेल / शिंदखेडा प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ कंपनीचे वरिष्ठ अभियंता यांच्याकडे शिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शिखेडा शहरात मागील महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरु आहे.आपण पुरवठा करीत असलेल्या विजेच्या प्रश्न शिंदखेडा शहरासाठी गंभीर होत चालला असून त्याचा भडका कधीही होऊ शकतो.

शिंदखेडा शहरात दररोज 6 ते 8 तास वीज बंद असते.आपण विजेचा पुरवठा व्यवस्थित करीत नसल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. शहरातील नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो. कारण नळ येतात त्यावेळी विजेची बत्ती गुल असते. परिणामी शहारातील नागरिकांना नळ असून पाणी नाही अशी गत होत आहे.यासंदर्भात लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांची समस्या सोडवावी अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण स्वतः व आपले वीज मंडळ जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. प्रसंगी अभियंता कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्याशी भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी यांनी फोनवर संवाद साधला होता. त्यांच्या अनुपस्थितीत लेखापाल जी एल नरवाड यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष भिला पाटील, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी,भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन,भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी,माजी नगरसेवक विनोद पाटील,दीपक चौधरी,चेतन परमार,सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार,उपशिक्षक जतिन बोरसे आदी.उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
Next articleविद्यार्थ्यांचा शत्रू हा आळस आहे – आ. नाना पटोले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here