Home भंडारा कोब्रा कमांडोचा चिरंजीव “आरव” याची सैनिक शाळेत यशस्वी वाटचाल (तुमसर नगरीसाठी अभिमानाचा...

कोब्रा कमांडोचा चिरंजीव “आरव” याची सैनिक शाळेत यशस्वी वाटचाल (तुमसर नगरीसाठी अभिमानाचा क्षण, प्रेरणादायी यश )

49
0

आशाताई बच्छाव

1001531734.jpg

कोब्रा कमांडोचा चिरंजीव “आरव” याची सैनिक शाळेत यशस्वी वाटचाल
(तुमसर नगरीसाठी अभिमानाचा क्षण, प्रेरणादायी यश )

 

संजीव भांबोरे
भंडारा_कोब्रा कमांडो म्हणून देशसेवा करणारे अमोल उपेंद्र वासनिक व सौ.हेमा अमोल वासनिक यांचा चिरंजीव ” आरव ” याने इयत्ता ५ वीतील सैनिक स्कूल चंद्रपूरची प्रवेश परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली असून, लवकरच तो इयत्ता ६ वी मध्ये सैनिकी शाळेत प्रवेश घेणार आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण वासनिक कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाचे व अभिमानाचे भाव म्हटले आहेत. “आरवच्या” यशाचे श्रेय त्याया अभ्यासु वृत्तीला,केला कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाला आणि विशेषत: देशासाठी कार्यरत असलेल्या त्याच्या वडिलांच्या प्रेरणेला जाते. सैनिक शाळेत प्रवेश मिळाल्याच्या बातमीने नातेवाईक ,शेजारी आणि मित्र परिवारामध्ये आनंदाची लाट पसरली असून सर्वत्र “आरववर” अभिनंदनचा वर्षाव होतआहे. आरवच्या या यशामुळे तुमसर नगरीतून इतर विद्यार्थिनीही अशा प्रकारच्या शैक्षणिक व देशसेवेच्या वाटचालीकडे वळावे असा सकारात्मक पायंडा सुरू होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. बालवयातच आरवने साधलेल्या या यशाचा आदर्श घेऊन अनेक पालक व विद्यार्थी सैनिक शाळेच्या दिशेने पावले टाकतील असा विश्वास व्यक्त होत आहे .या त्याच्या यशाबद्दल सुगंधा राहुल डोंगरे, शिल्पा दीपक गडपायले, अर्चना परमानंद डोंगरे , उपेंद्र वासनिक, सिद्धार्थ डोंगरे,मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे .

Previous articleशेतकऱ्यांनो, बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगा !
Next articleशहीद जवान संदीप गायकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here