आशाताई बच्छाव
अहिल्यानगर जिल्ह्यात १४ मे पर्यंत ‘यलो अलर्ट’
अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी- जिल्ह्याच्या काही भागात १४ मे पर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी प्रशासनाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे अथवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.






