आशाताई बच्छाव
उदगीर परिसरात ६ तास वीज पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त
बी.जी.शिंदे उदगीर / प्रतिनिधी
उदगीर विधानसभा मतदारसंघातील उदगीर जळकोट परिसरात सायंकाळी सहा वाजता वारा पाऊस आला, लगेच वीज पुरवठा खंडित झाला, वीज पुरवठा सायंकाळी सहा वाजताच्या पासून ते रात्री ११ वाजता पर्यंत खंडित राहिला, गेलेली रात्र येथील नागरिकांसाठी खूप त्रासदायक ठरली, ज्या मुलांची अकरावी, नर्सिंग, कोर्सेस, कॉम्प्युटर कोर्सेस, बीसीए, बीसीएस, बीए, बीकॉम, बीएससी, आर्ट, कला, वाणिज्य प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांच्या आता परीक्षा सुरू आहेत. ती मुले दिवसभर आपल्या अभ्यासात मग्न असतात, रात्री त्यांना पुरेश्या झोपेची गरज असते. नौकरदार, कर्मचारी वर्ग दिवस भराच्या कामातून थकलेले असतात त्यांनाही रात्री शांत झोपेची आवश्यकता असते. दिवसभर घरातील कामे करुन थकलेल्या गृहिणींना देखील रात्री शांत झोपेची आवश्यकता असते. आता उन्हाळा आहे पंखे, कुलर, एसी शिवाय लोकांना झोप लागत नाही. त्यातच डासांचा धुमाकूळ झोपेत विघ्न टाकण्याचे कार्य करत असते, उन्हाळ्यात सर्वांच्या घरी पाण्याची खूप आवश्यकता असते. या आधुनिक काळात सर्वांच्या घरी, पाण्यासाठी बोअरवेल आहेत, त्यातील पाणी विजे शिवाय वर काढू शकत नाही, अशात एखाद्याने घरच्या पाण्याच्या टाकीत वापरायचे पाणी कालच भरून ठेवले नसेल तर त्याची फजिती झाली असेलच यात शंका नाही.
या सर्व घटनेला वारा – पाऊस हे जबाबदार आहेत का? स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क १६:००% हे महावितरणला ग्राहकांकडून महावितरण ग्राहकांकडून घेत असते, ग्राहकांना उत्तम सुविधा द्यायला काहीच हरकत असायला नको? असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण होतांना दिसून येत आहे.
ग्राहकांना सुविधाजनक, महावितरण नीट व्यवस्थीत नियोजन करून, कुशल कर्मचारी वर्ग ठेऊन, ग्राहकांना उत्तम सुविधा का देत नाही हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज जग अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स ला कसे अंतराळातून परत पृथ्वीवर आणले गेले पाहत आहे. आपण थोडे वारा – पाऊस आले की लगेच वीज पुरवठा खंडित कसे होते हे पाहत आहोत.
महावितरणने ग्राहकांना होणाऱ्या अश्या असुविधेकडे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे. कुठे खांब वाकल्या गेले, तारा जास्त झुलत आहेत. विजेच्या तारा कुठे वारा – पाऊस आल्यास एकमेकांना स्पर्श तर होणार नाहीत ना, असतील तर महावितरण ने लगेच सुधार दुरुस्ती करून घेतले पाहिजे.
समोर मान्सून येत आहे रोज सोसाट्याचा वारा — पाऊस येणारच सतत झड २४ तास राहणारच मग महावितरण दिवस-रात्र वीज पुरवठा खंडित ठेवणार का? ही नामुष्की महावितरणवर येऊ नये या साठी योग्य उपाय योजना महावितरणने करून घेतल्या पाहिजेत. ग्राहक जसे महिन्याला वीज बिल भरतो तसेच त्याला महावितरणशी अपेक्षा ही बिलच्या रकमे पेक्षा दुप्पट असतात हे महावितरण ने विसरता कामा नये. शेवटी ग्राहक आहेत तर महावितरण आहे हे महावितरण ने लक्षात ठेवले पाहिजे.असे प्रखड मत ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी उर्फ नाना प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी व्यक्त केले. याची दखल त्वरित घेण्यास्तव त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, अध्यक्ष, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना ई-मेलद्वारे ग्राहकांच्या व्यथा मांडल्या आहेत.






