आशाताई बच्छाव
पत्रकारांनी खात्री करूनच बातमी प्रकाशित करावी-आ.खोतकर
जालना/ प्रतिनिधी दिलीप बोंडे
पत्रकारांनी बातमीची खात्री करून सत्य आणि अचूक अशी बातमी आपल्या दैनिकातून प्रकाशित करावी जेणेकरून एखाद्याच जीवन उध्वस्त होणार नाही व समाजात प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन आमदार तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी दैनिक गोकुळनिती तर्फे दर्पण दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमा प्रसंगी केले.
जालना येथील दैनिक गोकुळनितीच्या वतीने 6 जानेवारी 2025 रोजी कलश सीड्स येथील सभागृहात दर्पणदिन निमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष विकास बागडी हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जालना विधानसभा आमदार तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील ड. बाबासाहेब इंगळे, ड. महेश धन्नावत, ड. लक्ष्मण उढाण, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, कार्यक्रमाचे आयोजक दैनिक गोकुळनिती संपादक अर्पण गोयल यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, एखादी चुकीची बातमी एखाद्याचा आयुष्य उध्वस्त करू शकते त्यामुळे बातमीची खात्री झाल्याशिवाय बातमीची सत्ता त्या पाहिल्याशिवाय पत्रकारांनी ती प्रकाशित करू नये किती मोठी बातमी असली तो लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ती लपवू शकत नाही आणि आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे, समृध्द व सुसंस्कृत महाराष्ट्र आहे त्यामुळे ही परंपरा आपण जपली पाहिजे एखादी चुकीची बातमी ही आपल्या घरच्या विरोधात कोणी छापली तर ते आपल्याला किती वाईट वाटेल त्यामुळे बातमीची सत्यता तपासून बातमी प्रकाशित करावी.






