Home बीड बीड जिल्ह्यात केजमध्ये पुन्हा एका व्यक्तीच्या अपहरणाचा प्रयत्न जीव वाचवण्यासाठी काढला पळ

बीड जिल्ह्यात केजमध्ये पुन्हा एका व्यक्तीच्या अपहरणाचा प्रयत्न जीव वाचवण्यासाठी काढला पळ

72
0

आशाताई बच्छाव

1001108677.jpg

बीड जिल्ह्यात केजमध्ये पुन्हा एका व्यक्तीच्या अपहरणाचा प्रयत्न जीव वाचवण्यासाठी काढला पळ

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/केज ०१ जानेवारी २०२५ जिल्ह्यातील केज तालुक्यात पुन्हा एका व्यक्तीचे अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काम मंजूर करून आणण्यासाठी मुंबईला चल म्हणून अपहरण करून मारहाण केल्याचा दावा अपहरण करता करीत असून, मी जीव वाचवण्यासाठी पळून आल्याचा दावा करण्यात आला. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली असून, बीड जिल्ह्यात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्ञानेश्वर गणपती इंगळे रा. कळंबअंबा हल्ली मुक्काम केज असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंगळे यांना अपहरणकर्त्यांनी मुंबईहून वीस लाखांच्या कामाला मंजुरी आणू म्हणून केज येथील कळंब चौकातून चारचाकी वाहनात बसवुन घेऊन गेले. चुंबळी फाटा येथील बंद असलेल्या पेट्रोल पंपामध्ये नेहुन मारहाण केले. पायाला लोखंडी साखळी लावून कुलूप लावले, दोन्ही हाताला दोरीने बांधले व माझ्या जवळील पैसे मोबाईल काढून घेतला. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत मी पळून आलो असल्याने जीव वाचल्याचा दावा अपहरण झालेले इंगळे करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांची भेट घेणार असल्याचे ते सांगत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार घडल्याने केजमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleयुवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिका कँलेडरचे प्रकाशन २६ जानेवारीला होणार…!
Next articleकेजमधील लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here