आशाताई बच्छाव
शनिशिंगणापुरात हातगाड्यांचे अतिक्रमण
भाविकांत नाराजी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष. नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
शनिशिंगणापुरात दिवाळी सुटीनंतर आता नाताळ सणाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढल्याने गावातील मुख्य रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, पूजासाहित्य, भिकारी आणि छायाचित्र काढणाऱ्या युवकांची गर्दी वाढली आहे. रस्त्यावर पैसे कमविण्याचे अतिक्रमण सुरु झाल्याने वाहतूक कोंडी तसेच शनिभक्तांना ये-जा करणे अवघड झाले आहे.
मागील पंधरा दिवसांपासून येथील गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली अहे. सध्या नाताळ सुटी व शालेय सहलीचे प्रमाण अधिक आहे. गर्दीत वाढ झाल्याने गावात व रस्त्यावा पूजासाहित्य विक्रेत्यांचे लटकू सक्रिय झाल्याने खासगी वाहनाने येणाऱ्या
भक्तांना सक्ती व दमदाटीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मागील आठवडयात शनिवार व रविवार या दोन दिवसात तीन लाख भाविकांची गदर्दी झाली होती. सध्या रोज एक लाखाहून अधिक भाविकांची गर्दी होत आहे. गर्दीचा फायदा महणून रस्त्यावर
खाद्यपदार्याच्या हातगाड्या गत असल्याने वाहतूक व्यवस्थेत इचण येत आहे.
गावातील रस्त्यावर आहवे उभे राहून वाहने अडविले जात आहेत. सल्पाका हातगाडया व मोटारसायकलवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कुणीच विचारणा करीत नसल्याने रस्त्यावर काकडी, पेरू, अननस व इतर खाद्यपदार्थ विक्रीचे अतिक्रमण वाइले आहे. दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांना भिकारी, गंध लावणारे, दोरा बांधणारे व छायाचित्र काढणारे भंडावून सोडत आहेत. वाचल्या तक्रारी असताना देवस्थान, ग्रामपंचायत अथवा पोलिस यंत्रणा कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे.






