आशाताई बच्छाव
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे लोकोपयोगी कार्य हेच त्यांचे स्मरण – प्रा. डॉ. भिंगे
श्रीरामपूर (दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- १८ व्या शतकात लोकोत्तर कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विवेकशील चरित्राचा वसा आणि वारसा जपला पाहिजे. त्यांनी प्रतिकूल वातावरणात लोकोपयोगी विविधांगी कार्य केले, तेच त्यांचे चिरंजीव स्मारक व स्मरण होय, असे विचार नांदेड येथील पिपल्स कॉलेजचे प्रा.डॉ. यशपाल भिंगे यांनी व्यक्त केले. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२९ व्या पुण्यतिथी निमित्त प्रबोधन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबुराव उपाध्ये होते. तर माजी प्राचार्य टी.ई. शेळके, वाणिज्य विभागाचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव बारगळ उपस्थित होते. यशवंत नागरी पतसंस्थेतर्फे मान्यवरांचा सन्मान काण्यात आला. यावेळी माजी आ. भाऊसाहेब प्राचार्य डॉ. शंकरराव कांबळे, गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रकाशराव करडे यांनी मनोगत व्यक्त केले, प्रसंगी अॅड. लोणे, डॉ ज्ञानेश्वर राहींज, सुखदेव सुकळे , प्रा. शिवाजीराव काळे, लक्ष्मण खाटेकर, सचिन काळे, गोरख बाराहाते उपस्थित प्रा. डॉ. होते. कार्यक्रमासाठी यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष साहेबराव रक्टे, उपाध्यक्ष मधुकरराव सातव, संचालक मोठ्याभाऊ दातीर,
प्रकाशराव करडे, बाळासाहेब लांडे, अंशुमन वाकचौरे, श्रीमती सुरेखाताई सुरेशराव सातव, मनिषाताई आदिनाथ गवळी, गुलाबराव पादीर, वसंतराव बारगळ, एकनाथराव खेडेकर, गजानन पुंड, दत्तात्रय गावडे, रावसाहेब करडे, व्यवस्थापक माधव निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक साहेबराव रक्टे, आभार उपाध्यक्ष मधुकर सातव यांनी मानले. तर सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. कार्यक्रमास सर्व सेवक, बचत गट आणि नागरिकउपस्थित होते.
श्रीरामपूर यशवंत नागरी पतसंस्थेच्यावतीने लोकमाता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाचे
दीपप्रज्वलन करताना विविध मान्यवर. (छाया अमोल कदम)