Home कोकण वाऱ्याने साधा नारळ पडला नाही; महाराजांचा पुतळा कसा पडला?

वाऱ्याने साधा नारळ पडला नाही; महाराजांचा पुतळा कसा पडला?

58
0

आशाताई बच्छाव

1000689912.jpg

वाऱ्याने साधा नारळ पडला नाही; महाराजांचा पुतळा कसा पडला?

भ्रष्ट महायुतीला जनता मातीत गाढणार,किल्ल्यावर सत्ताधाऱ्यांची झुंडशाही.

पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला.                                                      सिंधुदुर्ग/मालवण (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मोर्चाला आज मालवण येथे मोर्चाला संबोधित केले.

लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्यासाठी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारला. महायुतीच्या टक्केवारीच्या धोरणामुळे या पुतळ्यात सरकारने पैसे खाल्ले. त्यामुळे पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. परिणामी केवळ आठ महिन्यात हा पुतळा कोसळला.
सर्वांची मान शरमेनं खाली गेली. महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट महायुतील मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही.

महायुतीने गुजरातकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. पंडित नेहरूंच्या हस्ते अनावरण झालेले पुतळे आजही भक्कम स्थितीत आहेत. महायुतीच्या चोर, लुटारू, डाकू यांनी महाराष्ट्र लुटला आहे. पुतळा उभारणारा जयदीप आपटे २४ वर्षाचा आहे. त्याला अनुभव नसताना मूर्ती करायला दिली. आता तो फरार आहे. या परिसरात एक नारळ पडत नाही. छप्पर पडले नाही. पुतळा कसा पडला हा प्रश्न आहे. साधी ताडपत्री उडाली नाही. मुख्यमंत्री वाऱ्याचा वेगाचे कारण देत आहेत.

महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान मोदींच्या केले. एक वीटही अजून रचली नाही. या सरकारकडून काही होणार नाही. त्यामुळे जनता महायुतीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही किल्ल्यावर पाहणी करायला गेलो. त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गुंडगिरी केली. या ठिकाणी झुंड शाही आहे. ही झुंडशाही आता जनता खपवून घेणार नाही

Previous articleदलित बांधवांनी काँग्रेसच्या भूलथापांवर विश्वास ठेवू नये आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleप्रश्न. ?????????? कोणता आंबेडकर गट म्हणून मी आपला ? कोणास भिम सखा म्हणू मी आपला?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here