Home बीड काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाई: जिल्हाधिकारी

काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाई: जिल्हाधिकारी

130

आशाताई बच्छाव

IMG_20240321_063733.jpg

काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाई: जिल्हाधिकारी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: २० काळया काचा असणाऱ्या चार चाकी वाहनांवर दंडत्मक कार्यवाई करा असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ/मुंडे यांनी पारित केल्याने आरटीओ कडुन कार्यवाही सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत ४५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता चालू असेपर्यंत ही कारवाई मोहीम सुरूच राहणार आहे. लोकसभा निवडणूक काळात काळ्या काचा असणाऱ्या वाहनातून दारू, हत्यारे, पैसे याची वाहतूक कोणी करू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेने कारवाई केली जात आहे. पहिल्या दिवशी काळ्या फिल्म लावलेल्या ४५ वाहनांच्या फिल्म काढून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पथकातील मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, सचिन जमखंडीकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक योगेश रबडे, पूजा खडकीकर, पवन गायके श्रीराम क्षीरसागर, प्रदीप बिराजदार, शशिकांत जाधव, महेश भोसले अशा आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने जालना रोडवरील बीड बायपास रस्त्यावर महालक्ष्मी चौकात काल मंगळवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळ व संध्याकाळ दोन – दोन तास वाहनांची तपासणी करून चार तासात ४५ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरटीओ यंत्रणा सतर्क झाल्याचे पहायला मिळाले. ही यंत्रणा निवडणूक पूर्ण होईपर्यंत दररोज वाहनांची तपासणी करणार आहे.

Previous articleशेततळ्यात बुडून दोघ्या सख्ख्या भावांचा मृत्यू.
Next articleलासलगाव येथे होळी ते हनुमान जन्मोत्सवपर्यंत श्री हनुमान चालीसा पठण सोहळा–
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.