Home सामाजिक मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो.

मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो.

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_082328.jpg

मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो.

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

मैत्री हा शब्द आठवताच प्रथम डोळ्यांसमोर उभी राहते ती कृष्ण-सुदामा यांची मैत्री । महाभारताच्या काळातली ही मैत्री. पण भारताच्या इतिहासात ती अमर होऊन बसली । कृष्ण-सुदाम्याच्या मैत्रीची ह्या कथेचं नुसते स्मरण झाले तरी डोळ्यात पाणी येते. दोन व्यक्तींमध्ये मैत्रीची भावना केवढी महान असू शकते हे ही कथा सिद्ध करते.अशीच श्री कृष्णा ची महाभारतकालीन अजून एक मैत्रीची एक कथा प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे कृष्ण आणि अर्जुन ह्यांची युद्धात अर्जुनाबद्दलच्या असणाऱ्या भावना मुुुळे कृष्ण अर्जुन चा सारथी झाला, पण कृष्ण लढला नाही त्याने अर्जुनाला युद्ध करायला लावले.कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या बाबतीत मैत्रीचे रूपांतर भक्तिभावात झाले.
मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या बरोबर वेळ घालवल्यावर, त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर तयार होतो तो खरा मित्र अन तिच खरी मैत्री!
वय, जात, धर्म यांना न मानणारी
कधी हसवणारी तर कधी रडवणारी
मैत्री महणजे एकमेकाना सावरणारी
समजून घेणारी, सुखदुखात सहभागी होऊन
मदतीचा हात पुढे करणारी !
कुणावर जबरदस्ती करून आपली मैत्री त्याच्यावर थोपविता येत नाही. मैत्रीमध्ये एकमेकांबद्दल मनापासून काळजी असते प्रेम वाटायला पाहिजे. ती भावना मनात रूजायला हवी तरच मैत्री आयुष्यभर टिकते. आपले नातेवाईक जन्मानेच आपल्याला मिळालेले असतात पण आपले मित्र मैत्रिणी तरी आपण निवडू शकते. अनेक वेळेला रक्ताच्या नात्याएवढेच स्नेहाचे नाते जवळचे होऊन जातात.

रामभाऊ आवारे
प्रदेश कार्याध्यक्ष-वारकरी मंच महाराष्ट्र राज्य

Previous articleसरोज आल्हाट यांना इंडियन पिनॅकल आर्ट आयकॉन नॅशनल अवॉर्ड 2024
Next articleवाशीनाका येथील अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक खेळणी वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here