Home सोलापूर कुसळंब ता. बार्शी ग्रामपंचायत येथील विविध ९३ लाख १५ हजार रूपये विकास...

कुसळंब ता. बार्शी ग्रामपंचायत येथील विविध ९३ लाख १५ हजार रूपये विकास कामांचा उद्घाटन समारंभ

86

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240204_182816.jpg

कुसळंब ता. बार्शी ग्रामपंचायत येथील विविध ९३ लाख १५ हजार रूपये विकास कामांचा उद्घाटन समारंभ
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप सोलापूर

बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते ९३ लाख १५ हजार रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच कुसळंब गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातून नागरी सत्कार करण्यात आला.कुसळंब येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते २५/१५ अतर्गत गावांर्तगत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी ३० लाख,कृषी विभाग व पाटबंधारे विभाग अंतर्गत २१ लाख,सुजित काटकर शेत ते गाव ओढा पाणंद रस्त्यासाठी २५ लाख विकास कामांचे उद्घाटन व घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन साठी ६ लाख १५ हजार,जि.प.शाळा कुसळंब वाॅल कंपाऊंड व पेव्हीग ब्लॉक बसविण्यासाठी ५ लाख,पं.स. बार्शी यांच्या अंतर्गत विहीर दुरूस्ती साठी ३ लाख,पाणी पुरवठा डी.पी.साठी २ लाख इत्यादी कामाचे लोकार्पण करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असुन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आमदार राजाभाऊ राऊत हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत.

Previous article🙏🏻 मनन चिंतन🙏🏻 विषय:- स्वधर्माची व्याख्या
Next articleसटाणा तालुक्यातील मुळाणेत वायररोप तुटुन तिघांचा दुदैवी मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.