Home रत्नागिरी चंद्रावर जाण्याची स्वप्न बघताना पृथ्वीशी असलेली नाळ तोडू नये. अरूण मोर्ये यांचा...

चंद्रावर जाण्याची स्वप्न बघताना पृथ्वीशी असलेली नाळ तोडू नये. अरूण मोर्ये यांचा गणेशोत्सवात मखर सजावटीतून सामाजिक संदेश.

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0074.jpg

चंद्रावर जाण्याची स्वप्न बघताना पृथ्वीशी असलेली नाळ तोडू नये. अरूण मोर्ये यांचा गणेशोत्सवात मखर सजावटीतून सामाजिक संदेश                             रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ) 

पृथ्वीवरून चंद्राकडे झेपावणारी चांद्रयान 3 ची १० फूट उंचीची प्रतिकृती तयार करून यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी गावातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अरूण मोर्ये यांनी देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला आहे.

स्वहस्ते बनविलेली आणि रंगवलेली चांद्रयानाची प्रतिकृती, स्वलिखित कविता ही या देखाव्याची खासियत आहे.
जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात असलेली विषमता, विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगासमोर आदर्श निर्माण करताना खेडेगाव आणि शहर यातील फरक ‘भारत आणि इंडिया’ च्या माध्यमातून साकारण्यात अरूण मोर्ये यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या देखाव्याची दखल पंचक्रोशीतील नागरिक, प्रतिष्ठीत वर्ग, रसिक मंडळी यांसोबत सोशल मीडियावर ही घेण्यात आली आहे.
“भारत आणि इंडिया मध्ये सुवर्णमध्य काढूया’
‘माणसाला माणसांशी माणसाने जोडूया..”

माणसाची संकुचित व दुसऱ्यावर कुरघोडी करणारी वृत्ती बाजूला ठेवून आपापसात असलेले मनभेद आणि मतभेदांच्या भिंती पाडून नवी सक्षम पिढी निर्माण करूयात असा आशावाद त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Previous articleचासनळी विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
Next articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि) च्या संवाद बैठकीत १४ नवनिर्वाचित सभासदांचा प्रवेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here