आशाताई बच्छाव
शाळेतील विद्युत पोल हटविलयाने विद्यार्थ्यांचा धोका टळला !
पालकांनी मानले हिप्पळनारी ग्राम पंचायतीचे आभार !
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील हिप्पळनारी जि.प. प्राथमिक शाळेतील मैदानात गेल्या तीस वर्षांपासून धोकादायक विद्युत पोल होते. पावसाळ्यात त्या विद्युत पोल मध्य कधी – कधी आर्थिंग उतरत असल्याने त्यापासून विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला होता. ते विद्युत पोल इतरत्र हटवावे अशी मागणी पालकांनी करीत होते. पण गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून त्या मागणीची दखल कोणीही घेतली नव्हती. त्यावर नुसती चर्चा केली जात होती काम मात्र जैसे थेच होते. पण हिप्पळनारी ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच म्हणून श्रीमती इंदरबाई रामचंद्र शिंदे यांनी येताच या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत. पंधरा 15 ऑगस्ट २०२३ भारतीय स्वतंत्र दिनाच्या मुहूर्तावर विद्युत पोल हटविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मिटिंग मध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या सहमतीने ठराव पास करून घेऊन शाळेतील ते धोकादायक विद्युत पोल त्वरित अन्यत्र हटवून धोक्यापासून विद्यार्थ्यांचा बचाव केला आहे. त्या पोलची तारे गावातील लक्ष्मी मंदिरावरील लिंबाच्या झाडाच्या फांद्या लागत होत्या त्या फांद्या तोडण्याचे अवघड काम येथील गोपाळराव देशमुख व त्यांचे चिरंजीव पिंटु देशमुख सह त्यांच्या साथीदारांनी मोलाचे सहकार्य केले म्हणून ते पोल हटविणे सोपे गेले आहे. मुख्य म्हणजे शाळेतील विद्युत पोल हटविण्याची शाळेची व पालकांची अनेक दिवसापासूनची मागणी चंद्रकांत शिंदे यांनी पूर्ण केल्यामुळे येथील हिप्पळनारी ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचे शाळेच्या व पालकांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.