आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांना नविन पिककर्ज मंजूर करा शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड उठवा अन्यथा आंदोलन. भागवत पाटील सोमूरकर
.नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
. . नांदेड (देगलूर): देगलूर तालुक्यात सद्या शेतकरी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे संकटात सापडला असून शेतकऱ्यांना नविन पिकर्कज मंजूर करण्यात बँक टाळाटाळ करत असून शेतकऱ्याला वेठीस धरून नाहक त्रास दिला जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे खाते पेंडीग आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान योजना व दुष्काळ व पीक विम्याचे पैसे या खात्यावर पडत असल्यामुळे जाणून बुजून बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना फवारणीसाठी मशागतीसाठी लागणाऱ्या पैशाची अडचण होत असल्यामुळे त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असताना दिसत आहे म्हणून अशा बँक अधिकाऱ्यांमुळे शेतकरी आत्महत्या चे प्रमाण वाढत आहे एकीकडे शासन शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी जनजागरण करत आहे दुसरीकडे बँक अधिकारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असताना दिसत आहे यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावलेले आहे ते तात्काळ काढून शेतक-यांचे खाते पुर्ववत चालू करण्यात यावे. अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवा सेने च्या वतीने तीव्र आंदोलन व बँके समोर उपोषण करण्यात येईल या दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार बँकचे शाखाधिकारी राहतील असे निवेदन युवा सेना देगलूर तालुका प्रमुख भागवत पाटील सोमूरकर बँक अधिकाऱ्यांना निवेदना मार्फत देण्यात आले. त्यावेळी शिवसेना विभागप्रमुख हणेगाव, दिलीप ईनामदार , युवासेना तालुका प्रमुख समन्वयक , भागवत पाटील सोमूरकर, राजू पाटील रमतापूर, लक्ष्मण पाटील मानुरकर यावेळी उपस्थित होते