आशाताई बच्छाव
म्हसदी परिसरात पावसाअभावी नदी नाले कोरडे म्हसदी,(श्रीहरी बोरसे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
साक्री तालुक्यातील काटवान भागात जुलै महिना अखेर संपला तरी जोरदार पाऊस नसल्यामुळे छोटे छोटे बंधारे अद्यापही कोरडे ठणठणात आहेत, त्यामुळे शेतकरी वर्गात खरीप हंगामाची चिंता व्यक्त होत आहे.
परिसरात रिमझिम पावसावर शेती हिरवीगार झालेली दिसत असली तरी विहीर व छोटे मोठे बंधारे मात्र अद्यापही कोरडे ठणठणात आहे त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी रिमझिम पावसावर पेरणी केली आहे अशा शेतकऱ्यांची पेरणी वाया जात होती काय या चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत जुलै महिना संपला तरी देखील समाधानकारक पाऊस नसल्यामुळे विहिरींनी देखील तळ गाठायला सुरुवात केली आहे. आगामी कांदे लागवड व इतर पिकांसाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे काटवान भाग सोडला तर इतर ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे मात्र पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.