आशाताई बच्छाव
आमदार जितेश भाऊ अंतापुरकर
यांच्या संकल्पनेतून देगलूर येथे जनता दरबार कार्यक्रम संपन्न.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
देगलूर नांदेड – सर्व सामान्य जनतेचे प्रश्न तातडीने सुटावेत व शासनस्तरावर कुठलीही अडचण नागरिकांच्या कामाच्या आड येऊन त्यांची गैरसोय होऊ नये तसेच ग्रामीण व शहरी भागातील प्रशासकीय स्तरावरील अडचणी लवकर सुटाव्यात व नागरीकांचे काम मार्गी लागावे या धोरणेतुन आमदार जितेशभाऊ रावसाहेब अंतापुरकर यांच्या संकल्पनेतून जनता दरबार कार्यक्रम आज पंचायत समिती कार्यालय सभागृह देगलुर येथे पार पडला, यावेळी सर्व विभागातील अधिकारी व सर्व नागरिकांसमेव विविध विभागाच्या कामाचा आढावा आणि जनतेच्या समस्यांचे निराकरण व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच विविध विभागा कडुन नागरीकांची गैरसोय होता कामा नये ह्या हेतुने अधिकारी वर्गास तशी सुचनाही केली.