आशाताई बच्छाव
विठ्ठल मंदिराच्या भिंतीवर उगवलेल्या झाडांमुळे भिंतींना धोका.
माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आळी मिळी गुपचिळी असा प्रकार चालू असून नवरात्र मध्ये मंदिरातील साफसफाई करताना विद्युत रोषणाई करताना वाढलेली ही पिंपळाची झाडे लहान कोणाच्याही कसे लक्षात आले नाही हा एक फार मोठा संशोधनांचा विषय आहे ती जर वाढत गेली तर पूर्ण भिंतीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही सहज जरी नजर टाकले तरी ती झाडे दृष्टी पडतात परंतु मंदिरातल्या सगळ्यांचा कारभार डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखा असून कोणाला त्याची सूचक नसल्यासारखे वाटते आत्ताच हे कमी उंचीची झाडे जर वेळेच तोडली नाही तर भविष्यात मोठा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही याकरता प्रभारी कार्यकारी अधिकारी यांनी व तेथील संबंधित जबाबदाऱ्यांनी या संदर्भात काळजी घेणे अगत्याचे आहे एवढी मोठी घटना एकाही कनिष्ठ अधिकाऱ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत कोणाच्याही लक्षात कशी आली नाही हे विशेष आहे यापुढे अशी झाडे भिंतीवर उगवणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे मंदिर समितीवर सध्या असलेले सदस्यांची मुदत संपल्यामुळे पुढील आयुष्य पर्यंत तेच कामकाजात पाहतात परंतु ही बाबही त्यांच्या ध्यानात कशी आली नाही हे एक मोठे गोड कोडे आहे या भिंतीला धोका निर्माण होण्यापूर्वी झाडांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे