Home नांदेड माहुरची रेणूकादेवी!

माहुरची रेणूकादेवी!

182

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0032.jpg

अंबे एक करी उदास न करी ! भक्तास हाती घरी !! भाविकांस अनुभवयास मिळते. विघ्ने दूर करी, स्वधर्म उदरी दारिद्रय माझे हरी !! चित्ती मूर्ती बरी, वरामयकरी, ध्यातो तुला अंतरी !! वाचा शुध्द करी, विलंब न करी, पावे त्वरी सुंदरी !!                          लेखन-मनोज बिरादार ब्युरो चीफ नांदेड

यादव कालीन देवगिरी राजाने सुमारे ८०० ते ९०० वर्षापूर्वी रेणुकामातेचे मंदिर ( कमळाकार ) बांधल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुर्नबांधणी इ.स. १५४६ मध्ये झाल्या संबधीचा शिलालेख मुख्य दारावर अंकित केलेला आहे. या मंदिराचा विस्तार तीनशे नव्वद वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने इ.स. १६२४ च्या सुमारास केला. वास्तुशास्त्राच्या नियमाला अनुसरूनय हे मंदिर उभारल्या गेले आहे. गाभारा व सभामंडप या दोन भागात ते विभागल्या गेले आहे. गाभान्याचे प्रवेश व्दार चांदीच्या पत्र्याचा आहे. देवीचा मुखवटा हा ५ फुट उंची व ४ फुट रुंद आहे. दक्षिणाभिमुख चांदीने मढविलेल्या प्रवेशव्दारातून आपण प्रत्यक्ष रेणुकेच्या मंदिरात प्रवेश केल्यावर सुरू असलेल्या विविध पुजा-अर्चा व पुजाऱ्याने उच्चारलेल्या मंत्राने व तेला तुपाच्या नंदा दीपामुळे वातावरण अगदी प्रसन्न होते. पूर्वाभिमुख असलेला रेणुकेचे तांदळा स्वरुप तेजपुंज मुखकमलाच्या दर्शनाने अंतरात्म्याला मिळणारा आनंद अवर्णनिय आहे. देवीचे अत्यंत चित्ताकर्षक तेजोमय मुखकमल आपले चित्त केंद्रीत करते. भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्णनैन, रक्तवर्ण सिंदुर चर्चित मुखावरील शोभा ह्या बाबीचे वर्णन करणेच अश्यक्य आहे. नक्षीदार चांदीचा डोक्यावरील टोप रेणुकेच्या मुख तेजात अधिक भर घालते. पितांबर नेसल्याने ती अधिक मंगलमुर्ती दिसते विविध सुवर्णाभूषणे तिने परिधान केली असून भाळी मळवट भरलेल्या मुखात तांबुल आहे. सुर्याचे तेज तिच्या मुखावर प्रगटलेले आहे. अत्यंत चित्तवेधक – भेदक नजर सरळ आपल्या हृदयाचा ठाव घेत

सभामंडप परिसरात अग्रपूजेचा मान असणाऱ्या

पासून विजया दशमी पर्यंत केलेल्या घनघोर युध्दात विजय संपादन केल्यानंतर आई सिंहासनावर विराजमान

जाते, महाकालीस महावस्त्र अर्पण केल्या जाते.

अष्टमीस पहाटे विधीवत देवीची सर्व पूजा विधि झाल्यानंतर गुप्त अजावळी दिल्या नंतर यज्ञास सुरूवात होते. सप्तशतीचे पारायण केल्या जाते. होमामध्ये ऑटूबर, खैर, पिंपळ, वटवृक्ष, आघाडा या समिधा टाकल्या जातात. दहीभात, धान्य, पाचवृक्षाची लाकडे, अदी होमामध्ये अर्पण महाकाली, महालक्ष्मी व तुळजाभवानीची मूर्ती होते. हयाच कालखंडास शारदीय नवरात्र असे केल्या जातात. या पूर्वी नवग्रहाची पूजा केली जाते. सर्वच देव देवतांना अवाहन करून यज्ञास

!! आदिशक्ती रेणुकामाता !!

आहे. खालच्या बाजुला परशुराम मंदिर, दर्शनी भागात म्हणतात. शारदीय नवरात्रोत्सव रेणुकेच्या गडावर अतिशय शुचिर्भूत वातावरणात व निः सिम श्रध्देने प्रारंभ होतो. साजरा केला जातो. अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापने ने हया मंगल पर्वास सुरवात होते. विधीवत पूजा अर्चना करुन हवा मंगल दिनी एका दगडाच्या कुंडामध्ये मातृका भरुन त्यावर विवीध पाच प्रकारचे धान्य टाकल्या जाते. त्या कुंडावर मातीचा कलश ठेऊन विडयाची पाने, श्रीफळ ठेवल्या जाते, त्या कुंडाच्या बाजूला पाच ऊस उभारुन पूष्पहार अर्पण केल्या जातो. प्रतिपदे पासून नवमी पर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप अविरतपणे तेवत असतो. घटस्थापने पासून दसन्या पर्यंत पायस म्हणजे दहिभाताचा व पूरणपोळीचा नैवेद्य माहूर गडावरून नियमीत दाखविला जातो. या कालावधीत मंदीरात विधीवत यथासांग पूजा केल्या जातात.

गणपती मंदिर आहे. नवरात्र महोत्सवास देवी महात्म्यात अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र उत्सव म्हणजेच आदीशक्तीच्या पराक्रमाचा, शौर्याचा रणसंग्रामाचा पवित्र काळ, सतत नऊ दिवस दृष्ट राक्षसां सोबत रणचंडीकेने घणघोर युध्द व केलेल्या पराक्रमाच्या यशाचा तो काळ होय. महिषासूर या राक्षसा सोबत अश्विन शुध्द प्रतिपदे असल्याची अनुभूती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक

नवरात्रातील पंचमीस / ललितापंचमीस देवीचे मुखकमल अत्यंत आकर्षक आणि चित्तवेधक दिसते. हया दिवशी देवीची अलंकार पूजा केली जाते. महापूजा व महाआरतीही केल्या जाते. सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिल्या जातो. सुर्यास्तापूर्वी देवीचे अलंकार उतरवून महाआरती केल्या जाते. रात्रीला जागरण गोंधळ व गायक कलवंताच्या हजेरी मधून मातेचा उदो उदो केला जातो.

नवरात्रातील सप्तमीस जवळील महाकालीच्या गडावर जाऊन महाकालीची यथासांग पूजा केली

नवमीस दिवसभर अष्टमी प्रमाणेच पूजा विधी केली जाते. नवमीचा यज्ञ होऊन मंत्राचा जप केल्या नंतर यज्ञात पुरण पोळीची आहुती दिली जाते. अजावळी हा यज्ञ कुंडात दिला जातो. महाआरतीने नवमी यज्ञाची सांगता होते. दशमीस म्हणजे दस-यास देवीचे मुख्य ध्वज उतरवून त्या पवित्र खांबास पंचामृताने स्नान घालून शेंदुर, हळद, कुंकू लावून विधिवत पूजा केली जाते, ध्वज पताक्यास नविन वस्त्र चढविल्या नंतरपावसाचा नैवेद्य दाखवून महाआरती केल्या तालुका प्रतिनिधी जाते. गडावर असलेल्या सर्वच देवी-देवतांच्या मंदिरावर पताका लावल्या जातात. रेणुका पुत्र परशुरामाची पालखी सजवून त्या मध्ये परशुरामाची मुर्ती ठेवल्या जाते. त्या पालखीची मिरवणूक काढून ती पालखी सीमोल्लंघना करीता वरदायीच्या पहाडावर जाते. ही परशुरामाची पालखी जेव्हा रेणुका गडावर प्रवेश करते. तेव्हा रेणुकेच्या व्दारा समोर पालखी समोर अजावळी दिला जातो. रेणुकेस आपटा रुपी वृक्षाची पाने अर्पण करून महानैवेद्य दाखविल्या जातो. नवरात्रीच्या पूण्य काळात देवीच्या विविध स्पाच्या दर्शनाचा लाभ भाविकास होतो. हया काळा मध्ये रेणुकेच्या मुखकमलाचे विविध नऊ रुपे पहावयास मिळते.

Previous articleजिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ज्येष्ठासाठीचे कायदेविषयक शिबीर संपन्न…
Next articleस्थलांतरीत होणारी वानखेडची जगदंबा माता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.