आशाताई बच्छाव
चांडोळा येथील ढगफुटी व जाहुर मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे चांडोळा व जाहुर अनंत चतुर्दशी दिनी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून चांडोळा महसूल मंडळात ६७ मिमी पावसामुळे ढगफुटी झाली तर जाहूर मंडळात ६० मिमी पावसांची नोंद झाली . मुखेड महसूल मंडळात ५७ तर अंबुलगा मंडळात ५१ मिमी पाऊस झाला . तालुक्यात एकूण ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून १० रोजीही दिवसभर पाऊस सुरुच होता . त्यामुळे कापूस , ज्वारी , तूर पीक आडवे झाले आहेत . तालुक्यात महिन्यामुखेखपासून पावसाने उघडीप दिल्याने पीक धोक्यात येवून वाळून गेली … सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला . खरीप हंगाम सुरुवातीला पेरणीनंतर पीक उगवणी काळात पावसाने लगातार २५ ते २० दिवस हजेरी लावल्याने पिकांची वाढ खुंटली . पुन्हा पिके पिवळी पडली . त्यातून कसेबसे शेतकरी सावरत असताना ९ सप्टेंबर रोजी सकाळपासून वातावरणात बदल झाला . दुपारी शहरात मोठा पाऊस झाला . शहराजवळील चांडोळा महसूल मंडळात ६७ मिमी म्हणजे ढगफुटी सृदश पावसाने झोडपून काढले तर जाहूर मंडळात ६० मिमी , मुखेड मंडळात ५७ मिमी , अंबुलगा मंडळात ५१ मिमी , येवती मंडळात ४४ मिमी , मुक्रमाबाद मंडळात ३७ मिमी पावसाची नोंद झाली . जांब बु आणि बाऱ्हाळी मंडळात कमी पाऊस झाला . या पावसाने कापूस पूर्ण आडवा झाला आहे . सोयाबीन , ज्वारी , तूर , उडीद , सूर्यफूल , ज्वारी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे . चांडोळा महसूल मंडळात अनेक गावांमध्ये शेताचे मोठे नुकसान झाले असून गोठ्यांची पडझड झाली आहे . शेतात पाणी साचली आहे . जाहूर भागातही पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण पाटील बोडके यांनी सांगितले . कापसासह खरीप हंगामातील पिके वाया गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा कोलमडला असल्याचे सांगितले आहे . शनिवारीही दिवसभर पावसाची जोरात सुरुवात होती .