आशाताई बच्छाव
कत्तलीसाठी नेणार्या 52 जनावराची मुक्तता,आरोपीस अटक
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): महाराष्ट्र छत्तीसगढ़ राज्यातील काही मोठे व्यापारी हे गडचिरोली जिल्ह्यातील तसेच सीमावती भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडुन गायी खरेदी करुन त्यांना मालवाहु वाहनामध्ये अपुर्या जागेत कोंबुन दाटिवाटिनेच निदर्यतेने भरुन कत्तली करिता दुरवरील शहरात विक्रि करिता घेऊन जात असतात. अशाच प्रकारे मिळालेल्या गोपनीय माहिती नूसार मा.पोलीस अधिक्षक श्री.अंकित गोयल,सा.मा. अप्पर पोलिस अधिक्षक ( प्रशासन ) श्री समीर शेख, सा.मा. पोलीस अधीक्षक (अभीयान) श्री सोमय मुंडे,सा.मा.अपर पोलीस अधीक्षक अहेरी,प्राणहिता श्री अनूज तारे,यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी श्री मयुर भुजबळ यांच्या नेतृत्वात नाकाबंदी दरम्यान करालीसाठी वाहतुक करणाऱ्या दोन ट्रकची अडवणुक करुन 52 जनावराची मुक्तता करण्यात यश मिळाले.