आशाताई बच्छाव
सादर केलेला अन्यायकारक अहवाल रद्द करा…
अन्यथा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर
प्रतिनिधी-पेरणी झाल्यापासून सारखा पाऊस आहे.राज्यात सर्वाधिक पासून नांदेड जिल्ह्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुखेड तालुक्यात झाला आहे.दीड महिन्यापासून पावसात खंड नाही.यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचे सत्तर टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे.मुखेड तालुक्याची अशी परिस्थिती असतांना मुखेडच्या महसूल कार्यालयाने तालुक्यात केवळ 645 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला आहे.हे अत्यंत अन्यायकारक आणि संतापजनक आहे.हा अन्यायकारक अहवाल तात्काळ रद्द करून,शेतकऱ्यांना न्याय देणारा अहवाल नव्याने सादर करा.अन्यथा तहसील कार्यालयात तालुक्यातील शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करणार असा इशारा तहसीलदार काशिनाथ पाटील यांना स्वा.शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी 10 ऑगस्ट रोजी निवेदनातून दिला आहे.
शेतकरी पेरणीत दुबार-तीबार पेरणीच्या संकटाशी झगडत होता.खताची कृत्रिम टंचाई,भाववाढ यांचा सामना करावा लागत होता.त्यात पेरणीपासून लागलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून टाकले.आता शेतकरी केवळ शासकीय मदतीवर अवलंबून होता.अशात मुखेड महसूल कार्यालयाने तालुक्यातून केवळ 645 हेक्टर क्षेत्र महापुराने बाधित झाल्याची माहिती पुढे पाठवल्याची बाब समजली.हे अत्यंत अन्यायकारक आणि संतापजनक आहे.याबद्दल संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजीची चीड आहे.हा पाठवलेला अन्यायकारक अहवाल कोणत्या निकषांच्या आधारावर पाठवला गेला?तात्काळ महसूल प्रशासनाने यात दुरुस्ती करून नव्याने अहवाल सादर करावा असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.