आशाताई बच्छाव
करंजाडी नदीला आलेल्या पुराचे महिलांकडून औक्षण.
संदीप गांगुर्डे प्रतिनिधी
पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क
जाखोड लघु मध्यम प्रकल्प पूर्ण शंभर टक्के भरल्याने दि. 12 रोजी पहाटे तीनच्या सुमारास धरणाचा सांडवा निघाल्याने व इतरत्र नाल्यांचे पाणी नदीला आल्याने नदीला पुराची स्थीती निर्माण झाली आले. या पाण्याचा प्रवाह इतका गतिमान आहे व इतका जास्त आहे की या पाण्यात नदीकाठचे झाडे वाहून गेले आहेत . या पाण्याबरोबर माती, वाळू,मुरूम यांचे प्रमाण जास्त आहे यामुळे ठिकठिकाणी नदीपात्रात वाळूचे ढिग तयार होत आहे. करंजाडी नदीवरील सर्वच केटीवेअर बंधारे पूर्ण भरले आहेत. तसेच नदीपत्रात पुरातन मंदिर आहेत हे मंदिर आज पडण्याच्या स्थितीत आहेत. नदीला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत सुदैवाने कुठेही जीवित हानी झालेली नाही. पण मात्र पुराच्या पाण्यामुळे शेत जमिनीत पाणी जात असल्याने शेतकऱ्यांचे शेत जमीन खराब होत आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे शासनाकडून नदी काटच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच जाखोड धरणात इतरत्र डोंगरांमधून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग जास्त असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे.
करंजाडी नदीला आले पुराचे पाण्याचे पिंगळवाडे येथील महिलांनी नदीचे औक्षण करून नारळ इतर धान्याने ओटी भरून पूजन केले. यात सौ. सुमनबाई कोठावदे,सौ.रत्नप्रभा विखरणकर, सौ. शांताबाई कोठावदे,पुष्पाबाई कोठावदे. इत्यादी महिला उपस्थित होत्या