Home सोलापूर राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत...

राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्‍वभूमीवर पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परस्थितीची केली पाहणी. आमदार प्रकाश आवाडे

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220707-WA0023.jpg

राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्‍वभूमीवर पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परस्थितीची केली पाहणी. आमदार प्रकाश आवाडे

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ बीरो महादेव घोलप

 

राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्‍वभूमीवर पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परस्थितीची माहिती जाणून घेतली. पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालल्याने नदीकाठावरील तसेच मळेभागातील नागरिकांनी सतर्क रहावे, अशा सूचनाही यावेळी केल्या.

मागील चार दिवसांपासून कोकण भागासह धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. तर जिल्ह्यात येत्या 9 जुलैपर्यंत पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालली असून ती 57 फुटापर्यंत पोहोचली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पंचगंगा नदीकाठी प्रत्यक्ष भेट देत पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बोट क्लबच्या सदस्यांना बोलावून उद्भवणारी परिस्थिती पाहता आवश्यक त्या साहित्यासह सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. तसेच पूराचा सामना करण्यासाठी ज्याची गरज भासेल त्याची पूर्तता आपण करुन देऊ, अशी ग्वाही यावेळी दिली.

पाणी पातळीत गतीने वाढ होत चालल्याने नदीकाठावरील शेतकरी, नागरिक तसेच मळेभागातील नागरिकांनी सतर्क रहावे. प्रशासनाकडून मिळणार्‍या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

Previous articleकाळजी करू नका…लवकर बरे व्हा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here