Home सोलापूर महावितरणच्या भोंगळ कामहावितरणच्या भोंगळ कारभारामुळे कासारवाडी येथील मुख्याध्यापक सतीश गुंड यांना आपला...

महावितरणच्या भोंगळ कामहावितरणच्या भोंगळ कारभारामुळे कासारवाडी येथील मुख्याध्यापक सतीश गुंड यांना आपला जीव गमवावा लागला 

127

आशाताई बच्छाव

IMG-20220610-WA0022.jpg

महावितरणच्या भोंगळ कामहावितरणच्या भोंगळ कारभारामुळे कासारवाडी येथील मुख्याध्यापक सतीश गुंड यांना आपला जीव गमवावा लागला
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ biro Mahadev Gholap

 

कासारवाडी येथील मुख्याध्यापक सतीश गुंड यांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर मी महावितरणच्या जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यासाठी ऊर्जा मंत्री मा. नितीन राऊत साहेब यांच्या कार्यालयाशी देखील संपर्क साधला होता.

ऊर्जा मंत्र्यांनी आणि त्याच्या कार्यालयाने या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे बार्शी वीज कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि तंत्रज्ञ अशा दोघांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे यापुढे तरी शेतात पडलेल्या विद्युत तारांचा स्पर्शामुळे निष्पांपाना आपला जीव गमवावा लागणार नाही, अशी आशा करुयात.

आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी अनेकदा शेतकरी रात्री-अपरात्री शेतात जातात. त्यामुळे भविष्यात अशा घटना होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे जीव वाचतील.

महावितरणच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याबद्दल ऊर्जामंत्री मा. नितीन राऊत साहेबांचे मनापासून धन्यवाद!

यापुढे मोकळ्या विद्युत तारांमुळे एकाचाही जीव जाऊ न देणं, हीच मुख्याध्यापक मा. सतीश गुंड यांना श्रद्धांजली ठरेल.

Previous articleगडचिरोलीत नळाच्या पाईप लाईन मध्ये आढळला तरुणाचा मृतदेह।
Next articleमृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी निजामपुर पोलीस स्टेशन कडुन परीसरातील नागरीकांना करण्यांत आले आव्हान ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.