राजेंद्र पाटील राऊत
कलम 342 मध्ये करण्यात न आलेली दुरस्ती.1969 च्या संयुक्त संसदिय समीतीच्या शिफारशी व 348 खासदारांच्या निवेदना कडे केलेले सरकारच्या दुर्लक्षाचा परीनाम 11 करोड आदिवासीना भोगावे लागत आहे।
प्रकाश गेडाम,प्रांत संयोजक
वस्तापुर/अमरावती,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- आदिवासी भव्य सम्मेलन,भर उन्हात आदिवासी न्रुत्याच्या तालात निघाली रॅली
स्वातंत्र्या नंतर संविधान कलम 342 मध्ये धर्मातरीतांना डीलिस्टिंग करन्या ची तरतुद नसने,1969 च्या संयुक्त संसदिय समीतीच्या शिफारशी व 348 खासदारांच्या निवेदना कडे तात्कालिन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांनी केलेले दुर्लक्ष या मुडे आज भारतात 2011च्या जनगणनेनुसार 10.49 करोड आदिवासी पैकी 80 लाख ख्रिश्चन व 12 लाख मुस्लिम धर्मातरीत झाले आहेत तर”डाॅ. जे.के.बजाज यांच्या नेत्रुत्वातील सन 2009 ला “सेंटर फाॅर पाॅलीसी स्टडीज”च्या सर्वेक्षण प्रमाणे
नौकरी मध्ये हि धर्मातरीत आहेत
उत्तर पुर्व च्या 5 राज्यान मध्ये 111-IAS अधिकारी पैकी 96-IAS अधिकारी कन्वर्टेट ख्रिश्चन आहेत.या 5 राज्यान मध्ये 70 लाख आदिवासी पैकी 52 लाख आदिवासी ख्रिश्चन धर्मातरीत आहेत.आसाम मध्ये 19-IAS आदिवासी अधिकारी पैकी 9 ख्रिश्चन धर्मातरीत आहेत या राज्यात 33 लाख आदिवासी पैकी 3 लाख ख्रिश्चन धर्मातरीत आहेत.छत्तीसगड,झारखंड,ओडिशा या राज्यात 17 जनजाती भाप्रसे अधिकारी पैकी 8 भाप्रसे अधिकारी ख्रिश्चन धर्मातरीत आहेत या राज्यात 2.2 करोड आदिवासी पैकी 20 लाख ख्रिश्चन धर्मातरीत आहेत.या धर्मातरन समस्येवर कायम उपाय म्हणजे संविधान कलम 342 मध्ये दूरस्ती करुन धर्मातंरीत जनजाती/आदिवासी चे आरक्षण बंद व्हावे, व बोगस आदिवासी ना काडुन ख-या आदिवासी ना नौकरी द्यावी या करीता जनजाती सुरक्षा मंच देशातील आदिवासी बहुल 288 जिल्हानमध्ये व 14 राज्यान मध्ये आदिवासी सम्मेलन घेउन या बाबत मा. राष्ट्रपती जी,मा.प्रधानमंत्री जी मा.राज्यपाल जी याना निवेदन करुन हि समस्या सोडविणार आहे.समाजाने जनजाती सुरक्षा मंच च्या या जनजागरन मेळावे सम्मेलन व आंदोलनाला,विचाराला सहकार्य करावे असे आवाहन प्रकाश गेडाम,प्रांत संयोजक जनजाती चेतना परिषद विदर्भ तथा डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र महाराष्ट्र,प्रदेश सरचिटणीस यानी केले आहे
जनजाती सुरक्षा मंच यांच्या वतीने अमरावती/वस्तापुर येथे आयोजित जनजाती/आदिवासींच्या भव्य सम्मेलनात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते अध्यक्ष म्हणून मा.संत श्री रामदास जी धांडे महाराज उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून मा.आम.प्रभुदासजी भिलावेकर. मा.रमेशजी मावसकर.सह-संयोजक,जनजाती सुरक्षा मंच.मा.सरस्वतीताई झामरकर.सरपंच वस्तापुर. मा.प्रा.राम ऊईके.अमरावती. मा.साबुलालजी दहिकर जिल्हा सरचिटणीस.मा.प्रा.सुखदेव जी पवार.मा.शामरावजी झामरकर.पोलीस पाटील.उपस्थित होते
धर्मातरीत आदिवासी ना आदिवासी यादीतून डीलिस्टिंग करा या जनजाती सुरक्षा मंच यांच्या मागनीचे मी समर्थन करतो.अस मत मा.आम.प्रभुदासजी भिलावेकर,मा.रमेशची मावसकर.मा.संत रामदासजी धांडे.मा.साबुलालजी दहिकर यानी व्यक्त् केले
प्रथम हनुमान मंदिर वस्चतापुर येथून जि.प.शाडा येथ पर्यंत आदिवासी वाद्यांच्या सुरात रॅली च्या माध्यमातून गावातून आदिवासी महिला,युवक, बांधव कार्यक्रम स्थळी पोहचले
यावेळी मा.रमेशजी आत्राम प्रांत संघटन मंत्री.मा.संजयजी राणे.मा.रामविलास दहिकर.जिल्हा संयोजक.मा.केलं व झामरकर जिल्हा सह-संयोजक. मा.गजानन जी येवले.उपसरपंच.मा.जोशी सर.मा.झामरकर ता.अध्यक्ष.उपस्थित होते