राजेंद्र पाटील राऊत
वासखेडी गावाची पाणी समास्या प्रशासक ग्रामसेवक यांच्याकडुन काही सुटेना ग्रामस्थ हतबल
दिपक जाधव -युवा मराठा न्युज नेटवर्क
धुळे/साक्री – वासखेडी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार महिनाभरापासून ,ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात पिण्याचे पाणी नळाला नाही,म्हणुन ग्रामस्थ अगदी हतबल झाले आहेत, गावातील ग्रांमपंचायतीचा संरपंच,सदस्य,यांचा कार्यभार संपल्यामुळे, ग्रांमपंचायतीला कायद्यानुसार प्रशासक म्हणुन ,श्री,भामरे लाभले असुन ,यांनी ग्रामसेवक सौ,बैरागी यांना गावातील समस्या याचे निराकरण करणे गरजेचे होते,पण तसे न करता कुठलीही ,सम्सयाचे निराकरण केले नसुन ,आज रोजी,पाण्यावरून गावातील समस्याचे निराकरण कोणत्या पध्दतीने करतील याकडे लोकांचे लक्ष लागुन आहे,
पण ग्रामसेवक यानी कुठलीही समस्याचे निराकरण न करता ,फक्त अश्वासने देत ,लोकांची दिशाभुल करत ,कारणे दाखवत टाळाटाळ करत ,कामात कुठेही समरसता न दाखवत,कामात नेहमी हडसळता असुन ग्रामस्थ अगदी हतबल झालेले आहेत,
पाण्याची समस्या खुप मोठी ,असुन त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,महिण्या भरापासुन गावातील पाणी समस्या जर सुटत नसेल तर..?
गावात खुप मुबलक पाणी आहे,पण नियोजना अभावी महिनाभर पाणी मिळत नाही ,याची वेळोवेळी शासनाने दखल घेतली पाहीजे,
प्रशासक,ग्रामसेवक फक्त नावाला आहेत,तोंडी अश्वासन पण प्रत्याक्षात मात्र झिरो,एकदातरी प्रशासक यांनी समस्याचे कुठलेही निराकरण न करता पदाचा उपयोग घेता निराकरण केले नाही,अथवा समस्या समजुन घेतल्या नाही, स्वत: हवेत पण ग्रामस्थ मात्र उन्हात असा प्रकार आहे,पाणी समस्या जर येत्या दोन दिवसात सुटली नाही तर ,मी पत्रकार दिपकभाऊ जाधव. ग्रामसेवक यांच्या विरोधात उपोषणास बसण्यासाठी तयार आहे.