राजेंद्र पाटील राऊत
बदलत्या वातावरणामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत
नाशिक-सागर कटाळे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यात सकाळपासून पावसानं हजेरी लावलीये.थंडी, पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात संकटात सापडल्या आहेत. सलग दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे परंतु या वर्षीही नको तेच झाले. द्राक्षांप्रमाणेच टोमॅटोलाही पावसाचा फटका बसलाय. टॉमॅटो शंभरीवर गेला असताना शेतक-यांना चांगला पैसा हाती लागण्याची आशा होती. मात्र पावसामुळे काढणीला आलेला टोमॅटो खराब होतोय. तर ढगाळ वातावरणामुळे कांद्यालाही दणका दिलाय.चांदवड येथील कांदा उत्पादकांना नुकसान टाळण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागतेय. अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या तूर फुलोर्यात तर कुठे शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे, अशा स्थितीत तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे. याचा मोठा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या वातावरणाचा फटका सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांवरही बसण्याचे चिन्ह आहेत.अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रडवलं आहे. वातावरणातील बदलाचा फटका यंदा सर्वच हंगामातील पिकांना बसलेला आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याला सतत संकटाला सामोरे जावं लागत आहे.आता तरी सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे .