Home नांदेड अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा शिवशंकर पाटील कलंबरकर मुखेड कृषी उत्पन्न...

अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा शिवशंकर पाटील कलंबरकर मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष.

194
0

राजेंद्र पाटील राऊत

अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा
शिवशंकर पाटील कलंबरकर

मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष.

मुखेड प्रतिनिधी /मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद बाराहाळी जांब बु मुखेड शहरातील आडत व्यापाऱ्याकडून सोयाबीन सह शेतमाल खरेदी करताना मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष होत असून शासनाचे संबंधित व्यापार्‍यावर कारवाई करून शेतकर्‍यांची लूट थांबवावी अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी दिला यासंबंधी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव पवार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की तालुक्यातील आडत व्यापाऱ्याकडून सोयाबीन शेतमाल खरेदी करताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे जास्तीची कट्टी घेणे वजनात फरक करणे भावात फरक करणे अशा तक्रारी शेतकरी वर्गातून येत आहेत याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष भेटून होत असलेल्या प्रकारची माहिती दिली पण या संबंधी कारवाई करण्यात आली नाही तालुक्यात शेतकऱ्यांची होणारी लूट तात्काळ थांबवावी शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी.

Previous articleदेगलूर बिलोली चे नवनिर्वाचित आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे शपथविधीनंतर थेट शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी सरसावले.                         
Next articleरानवड साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा रविवारी होणार शुभारंभ; शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here